• Sun. Jun 7th, 2026
    सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा; CM देवेंद्र फडणवीसांचे कडक कारवाईचे आदेश

    HSC Board Exam 2025:सामूहिक कॉपी आढळल्यास अशा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी. तसेच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचनाही फडणवीस यांनी मंगळवारी दिल्या.

    महाराष्ट्र टाइम्स
    copy case1

    मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सामूहिक कॉपी आढळल्यास अशा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी. तसेच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचनाही फडणवीस यांनी मंगळवारी दिल्या.

    राज्यात मंगळवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चालणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. या परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत चर्चा करतानाच परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. परीक्षाकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवावा, विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगण्यास मनाई करावी, भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे, संवेदनशील केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवावी, जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षाकेंद्रावर विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावी.
    अजबच! एका नोटेमुळे अख्ख्या सोसायटीला फुटला घाम, जो तो बोलतो माझी नाहीच, नोटेवर असं काय?
    प्रत्येक तालुक्यात विशेष प्रमुख, उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले. दहावी, बारावी परीक्षा कालावधीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.
    ‘चारकोपचा राजा’ मंडपातच! पुढील निर्णयापर्यंत मूर्ती जतन करण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा निर्णय
    बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपीच्या ४२ घटना
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेल्या ‘कॉपीमुक्त परीक्षा’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासह इतर विभागही पुढे सरसावले असताना, बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून ४२ गैरप्रकार पकडण्यात आले. हे सर्व प्रकार नक्कल म्हणजेच कॉपी करण्याचे होते. नऊ विभागीय मंडळांमधील एकूण १९ केंद्रांवर ही प्रकरणे आढळली आहेत.
    Nana Patole: खतांच्या खरेदीत तब्बल ८७ कोटींचा भ्रष्टाचार; नाना पटोलेंचा कृषी विभागावर गंभीर आरोप
    राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणारी बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी भरारी पथके, बैठी पथके यांच्यासह अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ विभागीय मंडळांद्वारे होणाऱ्या या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची ४२ प्रकरणे पकडण्यात आली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *