नागपूर ते गोवा जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र समर्थकांसोबत बैठक घेत शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दर्शवल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यातील शक्तिपीठांना जोडणारा सरकारचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. मात्र, या शक्तीपीठ महामार्गाला होत असलेला विरोध संपता संपत नाहीये. लोकसभेला महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने विधानसभेला सावध भूमिका घेतले. विशेष म्हणजे विधानसभेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा हा महामार्ग होणार नाही, म्हणत मार्ग रद्द झाल्याच अध्यादेश देखील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दाखवला.
आता पुन्हा निवडणुकीनंतर शक्तिपीठासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून वगळण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी महायुतीतीलच आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात क्रेडाईसह शहरातील विविध संघटनांसोबत शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा देत चर्चा केलीय.
अजित पवारांच्या बैठकीला अनुपस्थित, भरत गोगावले यांनी थेट सांगितले कारण, म्हणाले, फक्त…राज्यातील प्रमुख तीन शक्तीपीठांना आणि देवस्थानला जोडणारा हा मार्ग तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. वर्धा ते गोवापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा हा शक्तिपीठ महामार्ग असून यासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा येणार खर्च होणार आहे. या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार. शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले. कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील 59 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे.
दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा दिला असला तरी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही. याची अधिसूचना आधीच काढली आहे. लोकसभा निवडणुकीत या महामार्गामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. राजेश क्षीरसागर हे शहरात राहणारे आमदार आहेत. पण आम्ही ग्रामीण भागातील आहोत. ग्रामीण भागात या महामार्गाला विरोध होत आहे, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
शक्तीपीठ महामार्गबाबत महायुतीत मतमतांतर, वाद वाढण्याची शक्यता, हसन मुश्रीफ भूमिकेवर ठाम
राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती देखील आक्रमक झाली आहे. या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाचे सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तयार केलेली सुजलाम सुफलाम जमीन विदर्भासारखे भकास करायची आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोल्हापुरात प्रचारादरम्यान शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार नाही असे म्हटले होते. आता त्यांच्याच पक्षातील नेते त्यांना खोटं ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही महामार्ग कोल्हापुरातून जाऊ देणार नाही भूमिका शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने घेतलीये.
कोल्हापुरात महायुतीतील नेत्यांमध्येच शक्तिपीठ महामार्ग संदर्भात मतमतांतर असल्याने आणि राजेश क्षीरसागर यांनी बिल्डर आणि कंत्राटदारांसोबत घेतलेल्या बैठकीने नव्या वादाला तोंड फोडलय. यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार की शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती याला हद्दपार करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

