• Mon. Mar 16th, 2026
    निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात आहेत, दिल्ली निकालानंतर संजय राऊत भडकले

    Sanjay Raut on Delhi Election : दिल्लीत निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा मोठं यश मिळाल्याचं समोर आलं आहे. या निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : शनिवारी, ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत विधानसभा निडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात भाजपचा विजय झाला असून आपचे अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला. या पराभवावर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक यंत्रणा लोकशाही पद्धतीने लढल्या जात नाहीत, त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात, की आम्हाला जिंकायचंच आहे, आम्हाला हरवायचं आहे. आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचा आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. मतदार यादीतील घोटाळा जो महाराष्ट्रात पाहिला तोच दिल्लीत दिसतो. तोच बिहार, हरिणायामध्येही दिसतो. पण याचा बाऊ न करता, की यामुळेच हरलो, त्यामुळेच हरलो. पुढल्या लढाईसाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा जनतेने दिलेला संदेश आहे, असं राऊत म्हणाले.
    एकनाथ शिंदे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आणि तुम्ही म्हणता नाराज… उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांचं अजब स्पष्टीकरण
    महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीने जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता. हे आकडे सांगतात. आता लढायचं किंवा एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. नाहीतर केंद्रात किंवा राज्या-राज्यात जे चाललं आहे एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे. पण त्याने देश टिकेल का? लोकशाही टिकेल का? विरोधी पक्षाचा आवाज राहिला का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
    Eknath Shinde : ‘सोन्याची अंडं देणारी कोंबडी समजून मुंबईला…’, एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर खोचक निशाणा
    आण्णा हजारे काय म्हणतात त्याला काही अर्थ राहिलेला नाही. आण्णा अचानक जागे होतात. मोदी काळात किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला, अनाचार झाला, लोकशाहीवर हल्ले झाले, तेव्हा आण्णा हजारेंनी काहीच हालचाली केल्या नाही. त्यांना दिल्लीतील केजरीवालांच्या पराभवाने आनंद झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला तो दु:खद आहे, तो लोकशाहीला मारक आहे. केजरीवाल आणि आण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. आण्णा देशाला त्यामुळेच माहिती झाले. १२ वर्षात देशात अनेक संकटं आली. देश लुटला जातोय, देश विकला जातोय. एकाच उद्योगपतीच्या घशात देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जातेय. भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये पवित्र करुन घेतलं जातंय. ज्यांच्यावर आण्णा हजारेंचे आरोप होते, ते भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये आहेत. आण्णा हजारेंना त्यावर आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही, यामागे रहस्य काय आहे, असा सवालही त्यांनी केला.

    Sanjay Raut : निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जात आहेत, दिल्ली निकालानंतर संजय राऊत भडकले

    केजरीवाल हरले, निवडणुकांत हार-जीत होते, त्यांनी तो पराभव स्वीकारला आहे. पण याचा आनंद आण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना, किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल, तर त्याचा दु:ख वाटतं. केजरीवाल हरले असले, तरी भाजप विजयी झाला, नरेंद्र मोदी विजयी झाले, अमित शाह विजयी झाले, ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणला आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    मुंबई उपनगरच्या ‘आर मध्य’ आणि ‘एच पश्चिम’ वॉर्डातील सर्व वृक्षांची आरोग्यविषयक सखोल तपासणी – मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
    बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    महाराष्ट्र हे उद्योग व गुंतवणुकीची उत्कृष्ट परिसंस्था असलेले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed