• Thu. Mar 12th, 2026
    नेत्यांनी सर्वांची कामे करावीत; नितीन गडकरी यांच्या स्वपक्षाला कानपिचक्या, रोख नेमका कुणावर?

    Nitin Gadkari : सत्ता मिळाल्यानंतर लोकप्रतिनिधी मंत्री बनतो. मंत्री झाल्यानंतर तो सर्वांचा असतो. त्यामुळे सर्वांची समाजपयोगी कामे करायला हवीत, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाला कानपिचक्या दिल्या.

    महाराष्ट्र टाइम्स
    nitin gadkari

    पुणे : ‘सत्ता मिळाल्यानंतर लोकप्रतिनिधी मंत्री बनतो. मंत्री झाल्यानंतर तो सर्वांचा असतो. त्यामुळे सर्वांची समाजपयोगी कामे करायला हवीत,’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाला कानपिचक्या दिल्या. ‘स्वपक्षातील लोकांचे समाजपयोगी काम नसले, तर ते करायचे किंवा नाही, याचा विचारदेखील संबंधित मंत्र्याने करायला हवा,’ असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

    एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय आमदार संमेलना’च्या वतीने देशभरातील आमदारांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रमात केंद्रीयमंत्री गडकरी दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन आदी या वेळी उपस्थित होते.
    गौतम अदानींचं मोठं मन; लेकाचं लग्न साधेपणाने करुन केलं कोट्यवधींचं दान, आकडा वाचून शॉक व्हाल!
    गडकरी म्हणाले, ‘स्वपक्षातील लोकांची समाजपयोगी कामे नसल्यास ती करायची किंवा कसे, याचा विचार व्हायला हवा. तरच नकारात्मक राजकारणातून आपण बाहेर येऊ. समाजात गुणात्मक बदल करायचा असल्यास लोकप्रतिनिधींच्या दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. समाजपयोगी, शाश्वत विकासाची कामे केल्यास जात, धर्म या भिंती ओलांडून राजकारण पुढे जाईल.’
    मी तर एक फाटका माणूस! राजाभाऊ वाजेंनी फेटाळले ‘ऑपरेशन टायगर’चे वृत्त, नेमकं काय म्हणाले?
    ‘टीका, शिव्या खाण्याची तयारी हवी’
    ‘कायदे बनविणे आणि राज्याला आर्थिकदृष्टीने चालना देणे ही विधिमंडळाची प्राधान्याची कामे आहेत. मात्र, या दोन्ही विषयांवरील चर्चेत आमदार सहभागी होत नाहीत आणि त्यात रुचीदेखील दाखवित नाहीत, ही खेदाची बाब आहे. लग्नसोहळे, अंत्यविधी इत्यादींना उपस्थिती लावणे हे लोकप्रतिनिधीचे जनसंपर्काच्या दृष्टीने कामच असते. मात्र, जनसंपर्कासोबतच विधिमंडळ कामकाजाची माहिती, संसदीय आयुधांचा वापर करून मतदारसंघातील समस्या या सभागृहात मांडणेही आवश्यक आहे. समाजातील सहिष्णूता कमी होत चालली आहे. मात्र, राजकारणात वावरत असताना टीका, शिव्या खाण्याची तयारी हवी,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed