Authored byमानसी देवकर | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम8 Feb 2025, 4:40 pm
२७ वर्षांनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी भाजप व पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. आपने फक्त दारू विकण्याचं काम केलं असा खोचक टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यावरही आम आदमी पक्षाला परिवर्तन करता आले नाही, असेही ते म्हणाले.