• Mon. Mar 9th, 2026
    राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ नंतर आता ‘ऑपरेशन लोटस’चे संकेत, सुरुवात जयंत पाटलांपासून होणार?

    Maharashtra Operation Lotus : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जोरदार यश मिळाले आहे. तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. महाराष्ट्रात सुद्धा याचे परिणाम येत्या काही दिवसात दिसणार असल्याचे संकेत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.

    Lipi

    अभिजीत दराडे, पुणे : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जोरदार यश मिळाले आहे. तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. त्यामुळे फक्त दिल्लीच नव्हे तर देशभरात भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्याचा परिणाम इतर राज्यात दिसायला सुरुवात देखील झाली आहे. महाराष्ट्रात सुद्धा याचे परिणाम येत्या काही दिवसात दिसणार असल्याचे संकेत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.

    महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे त्यात ठाकरे गटाला मोठे धक्के बसण्याची शक्यता देखील आहे. याचप्रमाणे आता भाजपने सुद्धा मिशन लोटसचे संकेत दिले आहेत. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. या मिशन लोटसची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रवेशापासून होणार असल्याचे बोलले जात आहे.
    अजित पवार म्हणाले, ‘स्वत:च्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अमित ठाकरे यांचं सडेतोड प्रत्युत्तर
    याचं कारण म्हणजे गडकरी इस्लामपूर येथील राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. गडकरी शैक्षणिक संस्थांमधील विकास कामांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. मात्र खरे कारण हे की जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आहे. जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या असून त्यांची भेट भाजपचे केंद्रीय नेते आणि रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी घेणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे विविध राजकीय चर्चांना खळबळ उडाली आहे.

    याच जयंत पाटील यांचा संभाव्य पक्षप्रवेशावर रवींद्र चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याला हेवा वाटेल असं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्याच्या कामाचे आकर्षण प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे आकर्षण भाजपकडे आहे. म्हणून आगामी काळात अशी अनेक आकर्षण भाजप कडे येतील असा सूचक इशारा चव्हाण यांनी दिला. मात्र जयंत पाटील यांच्या प्रवेशाची तारीख ठरली का असा विचारला असता रवींद्र चव्हाण यांनी यावर बोलणं टाळत काढता पाय घेतला.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed