• Fri. Mar 6th, 2026
    ठाकरेंचे ६ खासदार पक्ष सोडण्याची चर्चा, ‘ऑपरेशन टायगर’चा ‘बॉम्ब’ पेरणारे उदय सामंत म्हणतात…

    Shiv Sena UBT Leaders to join Eknath Shinde : ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार, यावर मी आजही ठाम आहे, असं सामंत म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन धनुष्यबाण असं नाव मिळालेला हा ‘बॉम्ब’ ज्यांनी पेरला, ते उद्योग मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार, यावर मी आजही ठाम आहे, असं सामंत म्हणाले.

    उदय सामंत काय म्हणाले?

    कोणतंही मिशन सांगून राबवलं जात नाही. मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा पाहता, त्यांना कुठलंही मिशन राबवण्याची गरज नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालते, हे अनेक जणांना कळून चुकलं आहे, त्यामुळे अनेक जण संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित आहे, असं उदय सामंत म्हणाले.
    Uddhav Thackeray : उद्धवजी येईपर्यंत तरी थांबा ना, ठाकरे गटाच्या नेत्यांची ‘नाराजां’ना विनवणी; पण दोघा शिलेदारांची एक्झिट ठरली
    मी पुढील ९० दिवसात मोठे पक्षप्रवेश होणार असं सांगितलं होतं, एक दिवस किंवा २४ तासात होणार, असं नव्हतो बोललो. रत्नागिरीत जो कार्यक्रम करुन दाखवला, ती झलक होती. मात्र ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत येणार, यावर मी आजही ठाम आहे. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व ठाकरेंपेक्षा भावनाशील असल्याचं अनेकांचं मत असल्याचं सामंत म्हणाले.

    Uday Samant : ठाकरेंचे ६ खासदार पक्ष सोडण्याची चर्चा; उदय सामंत म्हणाले, मी कुठलंही मिशन सांगून राबवत नाही! पण एकूण १०-१२ जण…

    Uddhav Thackeray : सहा खासदार उद्धव यांची साथ सोडण्याचे संकेत, दीड लाखांनी जिंकलेला ठाकरेंचा शिलेदार म्हणतो, माझी चर्चा…
    दरम्यान, विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत. राजकारणाच्या पलिकडचे आमचे मैत्र आहेत, मात्र त्यांना माहिती देणारे लोक चुकीचे आहेत. आपल्या पक्षाची परिस्थिती काय, प्रदेशाध्यक्ष पदावरुन काय वाद आहे, हे वडेट्टीवारांनी आधी पाहावं. उदय सामंत यांच्याबरोबर किती आमदार आहेत, हे पाहण्यापेक्षा. मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवत आम्ही गुवाहाटीला गेलो, पुन्हा मंत्री झालो. त्यांच्या राजकीय प्रवासात त्रास होईल असं कुठलंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. इतरांनी आमच्यात भांडणं लावण्याचं बालिश राजकारण करु नये, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed