• Wed. Mar 11th, 2026

    पारंपारिक पद्धतीने शेती आणि सेंद्रिय गुळ उत्पादनात भरारी, शेतकरी महिला व्यवसायात यशस्वी!

    पारंपारिक पद्धतीने शेती आणि सेंद्रिय गुळ उत्पादनात भरारी, शेतकरी महिला व्यवसायात यशस्वी!

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 8:58 pm

    आज अनेकांना शेती म्हटलं की, नकोशी वाटते… अनेक तरुण मंडळी स्वतःची शेती आणि गाव सोडून रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर होतात. मात्र अशाही परिस्थितीत लातूरमध्ये एक महिला पारंपारिक पद्धतीने शेती सोबतच सेंद्रिय गुळाची निर्मिती करतायत. या आहेत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खुंटेगाव येथील ३५ वर्षीय महिला शेतकरी रोहिणी कोल्हे… स्वतःच्या पाच एकर शेतीतून सेंद्रिय ऊस आणि त्यापासून सेंद्रिय गुळ निर्मितीचा उद्योग मागच्या दहा वर्षापासून उभा केलाय आणि तो व्यवसाय यशस्वीरित्या त्या चालवतायंत…. पुणे, मुंबई, सोलापूर, संभाजीनगर या भागात देखील त्या गुळाचा पुरवठा करतात… २०१४ पासून उभारलेल्या या व्यवसायात त्यांच्या पतीचा आणि मुलाचा आणि सासर्‍यांचा मोठा सहभाग मिळालाय. सेंद्रिय गुळ उत्पादनातून रोहिणी कोल्हे ह्या वर्षाकाठी किती उत्तप्न घेतात ऐका त्यांच्याच तोंडून….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed