• Mon. Jun 8th, 2026
    Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरीचा बाजार, शिवराज राक्षेला शंभर टक्के…’; सिकंदर शेखचा खळबळजनक दावा

    Maharashtra Kesari Final 2025 Controversy : राज्यभर महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात अंतिम आणि उपांत्य फेरीमध्ये झालेल्या लढतीमध्ये राड्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. शिवराज राक्षेवर अन्याय झाला की नाही? यावर मातीतील चपळ चिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिकंदरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : ‘महाराष्ट्र केसरी’ची ६७ वी स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली. अंतिम सामन्यामध्ये पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्र गायकवाड याचा पराभव करत हा किताब पटकावला. मात्र यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसलं. उपांत्य फेरीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याने मोठा राडा पाहायला मिळाला होता. पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयानंतर त्यादरम्यान झालेल्या राड्यात त्याने रागाच्या भरात लाथ मारली. तर त्यानंतर काही वेळाने झालेल्या फायनल सामन्यात महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना मैदान सोडलं होतं. यानंतर दोघांनाही कुस्तीगीर परिषदेने तीन वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. या सर्व वादावर प्रसिद्ध मल्ल आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने ‘महाराष्ट्र टाईम्स’सोबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड किंवा मी असू समोरून काही प्रतिक्रिया आल्याशिवाय हे घडू शकत नाही. शिवराज राक्षेला काल शंभर टक्के काल काहीतरी झालेलं आहे. त्याला शिवीगाळ झालेली आहे त्यामुळे त्याला राग कंट्रोल झालं नाही. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड एका तालमीतील आहे. फायनल सामन्यावेळी महेंद्र गायकवाड लढत का सोडून गेला माहित नाही. मात्र भरपूर तणावात आला त्याला कुस्ती कशी खेळायची हेसुद्धा विसरून गेला. जर्सी फाटल्यावरही त्याला गुण दिला नसल्याचं म्हणत सिकंदरने दोन्ही पैलवानांवर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे.

    शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर अन्याय झालेला आहे. तशी पंचांना मारहाण करण्याची पैलवानकीची शिकवण नाही. पण पैलवानही असं करूही शकत नाही, शिवराज राक्षेला पंचांनी शिवी दिली असल्याने त्यामुळे शिवराजला राग कंट्रोल झाला नाही. यात शिवराजची काही चूक नाही, पण त्यानेही मारहाण करायला नव्हती पाहिजे, असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.

    दरम्यान, कुस्तीमध्येही आता राजकारण येण्याबाबत स्पष्टपणे सिकंदरने आपलं मतं मांडलं. नवीन चांगले मल्ल येत आहे, त्यांचं खच्चीकरण होतं आहे. कारण वर जाऊन राजकारण होतंय त्यामुळे त्यांचं महाराष्ट्र केसरी खेळण्याचं मन होत नाहीये. महाराष्ट्र केसरीचा बाजार करून टाकल्याचं सिकंदर म्हणाला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed