Maharashtra Kesari Final 2025 Controversy : राज्यभर महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात अंतिम आणि उपांत्य फेरीमध्ये झालेल्या लढतीमध्ये राड्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. शिवराज राक्षेवर अन्याय झाला की नाही? यावर मातीतील चपळ चिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिकंदरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड किंवा मी असू समोरून काही प्रतिक्रिया आल्याशिवाय हे घडू शकत नाही. शिवराज राक्षेला काल शंभर टक्के काल काहीतरी झालेलं आहे. त्याला शिवीगाळ झालेली आहे त्यामुळे त्याला राग कंट्रोल झालं नाही. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड एका तालमीतील आहे. फायनल सामन्यावेळी महेंद्र गायकवाड लढत का सोडून गेला माहित नाही. मात्र भरपूर तणावात आला त्याला कुस्ती कशी खेळायची हेसुद्धा विसरून गेला. जर्सी फाटल्यावरही त्याला गुण दिला नसल्याचं म्हणत सिकंदरने दोन्ही पैलवानांवर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे.
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर अन्याय झालेला आहे. तशी पंचांना मारहाण करण्याची पैलवानकीची शिकवण नाही. पण पैलवानही असं करूही शकत नाही, शिवराज राक्षेला पंचांनी शिवी दिली असल्याने त्यामुळे शिवराजला राग कंट्रोल झाला नाही. यात शिवराजची काही चूक नाही, पण त्यानेही मारहाण करायला नव्हती पाहिजे, असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.
दरम्यान, कुस्तीमध्येही आता राजकारण येण्याबाबत स्पष्टपणे सिकंदरने आपलं मतं मांडलं. नवीन चांगले मल्ल येत आहे, त्यांचं खच्चीकरण होतं आहे. कारण वर जाऊन राजकारण होतंय त्यामुळे त्यांचं महाराष्ट्र केसरी खेळण्याचं मन होत नाहीये. महाराष्ट्र केसरीचा बाजार करून टाकल्याचं सिकंदर म्हणाला.

