Navi Mumbai International Airport : नवी मुंबई उलवे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मे महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर मुंबईतील विमानतळावरुन काही उड्डाणं नवी मुंबईतून केली जातील.
मुंबईतील उड्डाणं नवी मुंबईत हलवली जातील
गेल्या ७० वर्षात मुंबईची लोकसंख्या १० पटीने वाढली, पण विमानतळ मात्र तसंच राहिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळाच्या T1 आणि T2 वरून चालणारी काही उड्डाणं नवीन विमानतळावर हलवली जातील.
रायगड जिल्ह्यातील उलवे इथे नवीन विमानतळ बांधण्यात आलं आहे. येथील व्यावसायिक उड्डाणं मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २० ते ३० लाख प्रवासी येऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
आता मुंबई ते गोवा सुस्साट…. १२ तासांचा प्रवास ६ तासांवर, कुठून, कसा असेल मार्ग?
ऑक्टोबर २०२५ पसून मुंबई T1 बंद होणार
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२४ मध्ये ५.५ कोटी प्रवाशांना सेवा दिली. मे पासून सुमारे १.१ कोटी प्रवासी नवी मुंबई विमानतळावर प्रवास करतील. मुंबई विमानतळाचं T1 टर्मिनल पुनर्बांधणीसाठी ऑक्टोबर २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर २०२९ मध्ये ते पुन्हा सुरू होईल. चार वर्षांनंतर मुंबई विमानतळाची क्षमता दीड कोटींवरून दोन कोटींपर्यंत वाढणार आहे.
सध्या मुंबई विमानतळाच्या T1 वरून १.५ कोटी प्रवाशांची उड्डाणं होतात. त्यापैकी १ कोटी प्रवाशांना घेऊन येणारी उड्डाणं ऑक्टोबरच्या अखेरीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T1 वर स्थलांतरित होतील. उर्वरित ५० लाख प्रवाशांना मुंबईच्या साहारा येथे असलेल्या T2 मध्ये जाता येईल.
कल्याण, डोंबिवली, बदलापूर प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?
नवी मुंबईत २०२९ मध्ये T2 तयार होणार
मुंबईच्या T2 टर्मिनलची क्षमता ४ कोटींवरून ४.५ कोटी प्रवाशांपर्यंत नेण्यात येणार आहे. नवी मुंबई T1 विमानतळ २०२६ च्या मध्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. तर २०२९ मध्ये नवी मुंबईतही T2 तयार होईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेपासून सुरू होणार, पण २०२९ पर्यंत बंद राहणार मुंबईचं T1 टर्मिनल
दरम्यान, एव्हिएशन टर्बाइन इंधन हे विमानांमध्ये वापरलं जाणारं इंधन आहे. विमानतळ प्राधिकरणाने एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कर (व्हॅट) १८ टक्क्यांवरून १ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करणारा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.

