Nanded Manojrao Bhandari Left Thackeray Group: नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे आणखी एका नेत्याने ठाकरेंची साथ सोडली आहे. आता शिवसेना कॉर्पोरेट झाली आहे असं म्हणत त्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटाला राम राम केला.
डॉ. मनोजराज भंडारी हे निष्ठावंत शिवसैनिक अस ओळखले जायायचे मागील ४० वर्षांपासून म्हणजेच १९८५ पासून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. विविध पदावर राहून पक्ष वाढीचे कार्य देखील केले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. नांदेड उत्तर मधून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मागणी केली होती, मात्र पक्षांकडून उपऱ्या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले होते. याच नाराजीतून लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉ मनोजराज भंडारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे काही दिवसा पूर्वी जिल्हाध्यक्ष पदावर असलेले माधव पावडे, शहराध्यक्ष पप्पू जाधव, राज्य संघटक एकनाथ पवार यांच्या सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातच भंडारी यांनी देखील साथ सोडल्याने नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पडझड झाल्याच चित्र पहायला मिळत आहे.
शिवसेनेत हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला पडलाय
लोकसभा सहसंपर्क प्रमुख मनोजराज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावबकुळे यांच्या उपस्थितीत भंडारी यानी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.पक्ष प्रवेशानंतर भंडारी यांनी शिवसेनेवर आरोप देखील केले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अस शिवसेनेचे धोरण होते, पण आता पक्षात ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण अस सुरु आहे. शिवसेना कॉर्पोरेट झाली आहे, बिसनेस सुरु आहे. हिंदुत्व मुद्दा देखील बाजूला पडला आहे अस भंडारी म्हणाले.
भंडारी यांचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत
शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ मनोजराज भंडारी यांचे पक्ष प्रवेशानंतर नांदेडमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचा नांदेडच्या रेल्वे स्टेशन येथे स्वागत करण्यात आले. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांना प्रदेश सह संयोजक पदी निवड देखील करण्यात आली आहे. पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.

