• Wed. Mar 18th, 2026
    ‘न्याय मिळाला नाहीतर, इथेच आत्महत्या…’ सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा प्रशासनाला थेट इशारा

    Parbhani Somanath Suryawanshi Mother : याचदरम्यान आंदोलक सोमनाथ सुर्यवंशीला न्यायालयीन कोठडी मिळाली. पण याच कोठडीदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनीच सोमनाथची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुन त्याच्या कुटुंबीयांना न्याया मिळावा सोमनाथच्या कुटुंबीयांसह आंबेडकरी समाजही आक्रमक होऊन न्यायाची मागणी करत आहे. यातच सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जिल्हाधिकाऱ्यांसमोर न्यायाची याचना केली आहे.

    Lipi

    परभणी : परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली होती आणि निदर्शनेही केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी बंदही पुकारण्यात आला होता. यादरम्यान पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली होती आणि काहींना अटकही केली होती. याचदरम्यान आंदोलक सोमनाथ सुर्यवंशीला न्यायालयीन कोठडी मिळाली. पण याच कोठडीदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनीच सोमनाथची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर सोमनाथच्या कुटुंबीयांसह आंबेडकरी समाजही आक्रमक होऊन न्यायाची मागणी करत आहे. अनेक राजकीय पक्षांकडून कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात येत न्यायाची मागणी जोर धरत आहे. यातच आज वंचित बहुजन आघाडीकडून जनअक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि भाऊ सहभागी झाले होते. यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जिल्हाधिकाऱ्यांसमोर न्यायाची याचना केली आहे.

    सोमनाथ सूर्यवंशी , आंबेडकर चळवळीचे नेते विजय वाकोडे तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील शनिवार बाजार परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सोमनाथच्या कुटुंबीयांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोमनाथच्या आईने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंसमोर न्यायाची याचना केली आहे. त्या म्हणाल्या ‘तुम्ही न्याय दिला नाही तर मी इथेच आत्महत्या करून माझा जीव देणार असल्याचे सांगत त्यांनी याचना केली.

    यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी त्या म्हणाल्या, माझा जीव गेला तरी चालेल. पण न्याय मिळविल्याशिवाय मी शांत राहणार नाही. दीड महिना होऊन देखील हे प्रशासन दखल घेत नसल्याने आम्हाला वारंवार मोर्चे काढावे लागत आहेत. पण माझा जीव गेला तरी मी न्याय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा थेट इशाराच विजयाबाई सुर्यवंशी यांनी दिला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed