• Tue. Mar 10th, 2026

    धनंजय मुंडे प्रकरणात हस्तक्षेपास नकार; अजित पवारांची भूमिकाच अधिकृत, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती

    धनंजय मुंडे प्रकरणात हस्तक्षेपास नकार; अजित पवारांची भूमिकाच अधिकृत, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती

    Devendra Fadnavis On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

    महाराष्ट्र टाइम्स
    Maharashtra CM Devendra Fadnavis

    मुंबई : ‘धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांची भूमिकाच अधिकृत आहे’, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे या प्रकरणात ते कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचेच संकेत गुरुवारी दिले.

    मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी मात्र ठोस पुराव्याशिवाय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास एकप्रकारे नकार दिला आहे.
    Dhananjay Munde: …तरच मंत्रिपदाचा राजीनामा देईन! राजकीय आरोपांवरुन धनंजय मुंडेंचं मोठं विधान
    दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडेही दिल्लीत असल्याने त्यांची भेट झाली का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘धनंजय मुंडे त्यांच्या कामानिमित्त, तर मी माझ्या कामानिमित्त दिल्लीत आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी मंत्रिमंडळ बैठकीत आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्याची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. तसेच मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो.’ त्यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवारांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
    खबरदार, कामात कुचराई कराल तर…; चंद्रशेखर बावनकुळेंची अधिकाऱ्यांना ताकीद
    केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत एक बैठक होते. त्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री जात असतात. आपल्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत, या केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिल्या आहेत. त्याबाबत चर्चाही झाली आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
    प्रयागराजप्रमाणे नाशकातही झालेली चेंगराचेंगरी, २९ भाविकांनी गमावलेले प्राण, काय घडलेलं २००३च्या कुंभमेळ्यात?
    ‘लग्नातील भेटीने युती होत नसते’ चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्नसमारंभात भेट झाली. या भेटीनंतर शिवसेना (उबाठा) आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यावर फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मार्मिक उत्तर दिले. ‘लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही भेट झाली असती. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे’, असा टोला फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींना लगावला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed