• Thu. Jun 18th, 2026

    पुण्यातील जिल्हा नियोजन बैठकीत ‘दादा विरुद्ध ताई’ घमासान होणार? अजितदादांनी सल्ला देताच सुप्रियाताईंनी यादीच वाचून दाखवली

    पुण्यातील जिल्हा नियोजन बैठकीत ‘दादा विरुद्ध ताई’ घमासान होणार? अजितदादांनी सल्ला देताच सुप्रियाताईंनी यादीच वाचून दाखवली

    Supriya Sule vs Ajit Pawar : पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज पुण्यातल्या डीपीडीसी बैठकीत ‘दादा विरुद्ध ताई’ असा घमासान होण्याची शक्यता आहे. दादांनी खोचक टीका केल्यानंतर आज पुण्यातल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे कोणते मुद्दे मांडतील, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

    Lipi

    आदित्य भवर, पुणे : पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज पुण्यातल्या डीपीडीसी बैठकीत ‘दादा विरुद्ध ताई’ असा घमासान होण्याची शक्यता आहे. नैतिकतेवर राजीनामा देण्याच्या मुद्यावर सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी खोचक सल्ला दिला आहे. तर, बीड प्रकरणात पोलि‍सांकडून कारवाईसाठी झालेला विलंब लक्षात घेत सुप्रिया सुळे यांनी मोठी यादी वाचून दाखवली आहे. त्यामुळे आज पुण्यातल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे कोणते मुद्दे मांडतील, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

    पुण्यात GBSचा वाढत असलेला धोका लक्षात घेता, सुप्रिया सुळे यांनी आज नांदेडगाव येथील स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याचा आढावा घेऊन माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान बीड प्रकरणावर लक्ष केंद्रित करत महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवले आणि याबाबत कोणतीही कारवाई का होत नाही, असा सवाल देखील सरकारला विचारला आहे.
    ‘ईडीची नोटीस आली तेव्हा…’; राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच ईडी चौकशीचा A टू Z किस्सा सांगितला
    सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘५१ दिवसांनंतरही संतोष देशमुख हत्याकांडातील एक आरोपी फरार आहे. तो अजून का सापडत नाही?’ त्यानंतर हरवेस्टर आणि पीकविमा घोटाळ्याबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पुष्टी केली आहे. याची चौकशी पुढे झाली का, याची माहिती मला पाहिजे.’

    बीड संदर्भात ऑफिस ऑफ प्रॉफिटबाबत काल पालकमंत्री म्हणाले की, ‘मी सर्व पुरावे मुख्यमंत्री यांना दिले आहेत, त्यामुळे पुढील निर्णय ते घेतील.’ काल मी एक प्रेस वाचली ज्यामध्ये १६ कोटी रुपयांचा आरोप आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोप केला की ७३ कोटींचे बोगस बिल देण्यात आले. त्याचं काय झालं? याची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी संतोष देशमुख आणि हेमंत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

    या प्रकरणाचे सर्व पुरावे अंजली दमानिया यांनी दिले आहेत आणि त्यांना सुद्धा पुरावे ट्विट करण्याचा विचार आहे. तसेच, हा मुद्दा संसदेत मांडण्याची योजना असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed