पुण्यात अन्न-औषध प्रशासन आणि अँटी नार्कोटिक्स सेल यांनी संयुक्त कारवाई केली आहे. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे धाड टाकली. यावेळी ट्रामाडोलयुक्त औषधांच्या बेकायदेशीर विक्री सुरु असल्याचं स्पष्ट झालं. या कारवाईत ट्रामाडोलयुक्त SPAS-TRASCEN-PLUS औषधाच्या 10,492 कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच बंडगार्डन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : अमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि औषधांच्या बेकायदेशीर विक्रीविरुद्ध कठोर भूमिका घेत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे गुन्हे शाखा अँटी नार्कोटिक्स सेल-१ यांच्या संयुक्त पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रामाडोलयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
अँटी नार्कोटिक्स सेल-१ यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुकेश भुराराम सिरवी (वय २८ वर्षे) हा कोणताही वैध औषध विक्री परवाना नसताना SPAS-TRASCEN-PLUS या ट्रामाडोलयुक्त औषधाची बेकायदेशीर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. सदर माहितीची पडताळणी करून अन्न व औषध प्रशासन आणि अँटी नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या कारवाईचे नियोजन केले. औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग तसेच अँटी नार्कोटिक्स सेल-१ यांच्या संयुक्त पथकाने ताडीवाला रोड परिसरातील संबंधित ठिकाणी छापा टाकला.
तपासणीदरम्यान SPAS-TRASCEN-PLUS (Dicyclomine Hydrochloride, Tramadol Hydrochloride आणि Acetaminophen Capsules) या औषधांचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ७३ बॉक्सेसमधील १०,४९२ कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या. जप्त औषधांची अंदाजे किंमत ६८,३२८ रुपये इतकी आहे. त्यामध्ये ४२४.०६ ग्रॅम ट्रामाडोल आढळून आले. हे प्रमाण अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम ( NDPS Act ) अंतर्गत निर्धारित “व्यावसायिक प्रमाण” (Commercial Quantity) श्रेणीत मोडत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
ट्रामाडोल हे एक शक्तिशाली वेदनाशामक औषध असून त्याचा वैद्यकीय सल्ल्याशिवाय अथवा गैरवापरासाठी वापर केल्यास व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा औषधांचा बेकायदेशीर व्यापार युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढविणारा असून सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे.
तपासादरम्यान सदर औषधांचा पुरवठा निलेश मोघे यांच्यामार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मुकेश भुराराम सिरवी आणि निलेश मोघे या दोघांना अटक केली आहे. तसेच संबंधित पुरवठा साखळीतील इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असून संपूर्ण वितरण व्यवस्थेचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियमांतर्गत कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन आणि अँटी नार्कोटिक्स सेल यांच्या समन्वयाने सुरू आहे.
“रामाडोलसारख्या औषधांचा गैरवापर युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढविणारा असून सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो. या बेकायदेशीर पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा