• Mon. Mar 9th, 2026

    जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, महिलांकडून रास्ता रोको; फडणवीसांना अल्टिमेटम देत रणरागिणी कडाडल्या

    जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, महिलांकडून रास्ता रोको; फडणवीसांना अल्टिमेटम देत रणरागिणी कडाडल्या

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2025, 8:01 pm

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.आज सकाळी जरांगेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीसांना अल्टिमेटम दिला आहे. मात्र, मराठा महिला आंदोलक आज आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. सोलापूर-धुळे महामार्ग जाम करण्याचा त्यांनी यावेळी प्रयत्न केला.मात्र पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी महिलांना तिथून हलवलं. सरकारला जागे करण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केला असं त्या म्हणाल्या. आमचा समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.सरकार झोपेचे सोंग घेत आहे, सरकार जाणून बुजून आमचे हाल करत आहे.सरकारला आरक्षण द्यायचे नाही का? की एकनाथ शिंदेंनी खोटी शपथ खाल्ली होती? फडणवीस यांनी आरक्षण द्यावे, नाहीतर या पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपाचे होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed