• Thu. Mar 19th, 2026

    Sanjay Raut : धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, शेवटी अमित शहा…

    Sanjay Raut : धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, शेवटी अमित शहा…

    Sanjay Raut : राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढत असताना ते दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीत असून, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय दिल्लीत होण्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे की महाराष्ट्रातील मंत्री दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठांकडे खुलासा करण्यासाठी जात आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महायुती सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढलेला दिसत आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातीलच आमदारांनी धनंजय मुंडे यांच्यार राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यादरम्यान धनंजय मुंडे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यासाठी गेले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याचा दिल्लीत निर्णय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. मंत्रिपद वाचवण्यासाठी दिल्लीत जावं लागत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे

    पद वाचवण्यासाठी शेवटी दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे मंत्री पण खुलासा द्यायला दिल्लीत अमित शहांकडं जावं लागतंय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई, बारामतीत आणि पुण्यामध्ये बसलेले असताना त्यांच्या पक्षाचा मंत्री दिल्लीत जातोय ही महाराष्ट्राची अवस्था असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचे जबाबदारी आपल्या शरीरावर पडलेली आहे हे त्यांनी समजून घ्यावं ते स्टार प्रचारक आहेत महाराष्ट्रात त्यांचे पक्षाने जागा जिंकलेले आहेत त्याचा श्रेय फडणवीस यांना मिळत आहे आणि महाराष्ट्राचा फॉर्मुला दिलेत वापरणार तर प्रचार न करता भाजप जिंकेल, असं म्हणत राऊतांनी टीका केली.

    प्रयागराज मध्ये येणाऱ्या कोट्यावधी लोकांची सोय कशी करत होती याचा मार्केटिंग सरकार करत होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील त्या संदर्भात जे मंत्री असतील त्यांनी संबंधित मंत्र्यांनी पक्षाच्या मार्केटिंग वर लक्ष देण्यापेक्षा पक्षाच्या मताच्या लाखो श्रद्धाळू व्यवस्था करावी त्याकडे लक्ष द्यावे. ज दहा पेक्षा जास्त श्रद्धाळू यांचे प्राण गेले त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या प्रधानमंत्री लक्षात ठेवून आहेत म्हणजे काय आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? असा सवाल राऊतांनी केला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed