• Wed. Mar 18th, 2026

    Sanjay Raut : ‘महाकुंभाची मार्केटिंग करण्यापेक्षा…’;चेंगराचेंगरीच्या घटनेवरून संजय राऊत संतापले

    Sanjay Raut : ‘महाकुंभाची मार्केटिंग करण्यापेक्षा…’;चेंगराचेंगरीच्या घटनेवरून संजय राऊत संतापले

    प्रयागराज येथ सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली असून यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री असतील त्यांनी पक्षाच्या आणि मताच्या मार्केटिंगकडे लक्ष देण्यापेक्षा भक्तांच्या व्यवस्थकडे लक्ष द्यावे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : कोट्यवधी लोकांची आम्ही कशी व्यवस्था केली आहे अशा प्रकारचं मार्केटिंग केलं आहे ते भाजप आणि उत्तर प्रदेश सरकार करत होतं. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही, ज्यांची श्रद्धा आहे अस्ता आहे ते वर्षानुवर्षे कुंभला जात आहेत. कोट्यवधी लोकांचे आकडे दिले जात आहेत. इतके लोकं आले तितके लोकं आले. सामन्य माणसांना दहा-दहा किलोमीटर चालावं जावं लागत आहे. जनतेच्या प्रतिक्रिया तेथील व्यवस्थेवर खूश नाहीत. शेवटी आज दुर्देवाने चेंगराचेंगरी झाली, माणसं तुडवली गेलीत, शेकडो लोक जखमी आहेत दहापेक्षा जास्त श्रद्धाळूंना आपले प्राण गमवावे लागले.

    गृहमंत्री स्नान करून गेले त्यावेळी तिथला लवाजमा पाहिला, संरक्षण मंत्री गेले तेव्हा घाट किंवा परिसर बंद केला जातो हा त्याचाही परिणाम आहे. कारण बाहेर तेवढे लोक असतात, याचा सगळ्याचा परिणामा पाहिला तर मी इतकंच सांगेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री असतील त्यांनी पक्षाच्या आणि मताच्या मार्केटिंगकडे लक्ष देण्यापेक्षा भक्तांच्या व्यवस्था आणि सुरक्षेकडे लक्ष देण गरजेचं आहे. प्रधानमंत्री लक्ष देऊन आहेत म्हणजे काय? आज दहा पेक्षा जास्त श्रद्धाळू यांचे प्राण गेले त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या प्रधानमंत्री लक्षात ठेवून आहेत म्हणजे काय आहेत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहेत ज्यांनी प्राण गमावले ते येणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

    1954 साली कुंभ झाला त्याची व्यवस्था पहा स्वतः देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी व्यवस्था कशी आहे पाहण्यासाठी तो दौरा केला. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे पूर्ण काळ तिथे उपस्थित होते अशी माझी माहिती आहे. अखिलेश यादव यांच्या काळातील कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वात उत्तम होती हे श्रद्धाळू आवर्जून सांगतात. या व्यवस्थापनामध्ये इतर पक्षाच्या लोकांना देखील सहभागी करून घेतलं असतं तर अशी परिस्थिती उद्भवलेली नसते पण श्रेयवाद आहे या श्रेय वादातून लोकांना प्राण गमवावे लागले. दहा हजार कोटींपेक्षा जास्त बजेट यासाठी दिलं गेलं पण प्रत्यक्षात दहा हजार कोटी दिसत नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed