• Sun. Jun 14th, 2026

    Sanjay Raut : ‘वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील’; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

    Sanjay Raut : ‘वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील’; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

    Sanjay Raut on Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरही बोट केले जात आहे. कराडला या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं जातंय. मात्र अद्याप कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. कराड खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे मात्र आता तो रूग्णालयात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : बीडमधील दहशताविरोधात सुरेश धसांचं तांडव सुरू आहे. या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. तरीही कराड रूग्णालयात आहेत, त्यांचं काय दुखत आहे माहित नाही. त्यांच्यासाठी मजला रिकामा केला असून इतर सवलती त्यांना मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिसत नाही का? धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचं सुरेश धस सांगत आहेत. अंजली दमानिया यांचा संघपरिवाराशी संबंध आहेत. त्यामुळे आज फैसला काहीच होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.

    नीती आयोग आणि शिखर बँक यांनी जी माहिती समोर आणली आहे त्यामुळे निवडणुकीधी रेवडी योजना जाहीर केल्यात त्यामुळे महाराष्ट्र राज्यावर ४५ हजार कोटींचा खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे, जाहीरनाम्यात घोषणा केली आहे, ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलू नका, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची ही भुमिका आहे. लाडक्या बहिणीबरोबरच कर्जमाफी करावी लागेल हे तुमचं वचन आहे. त्यामुळे आता पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून, अदानींच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तु्म्ही ठरवायचं. पण ज्या घोषणा तुम्ही केल्यात त्या पूर्ण कराव्या लागणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय. यावेळी बोलताना आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दारीवर बोलत आहेत, रस्सी जल गई पर बल नहीं गया, उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    लिहून दिलेली भाषणं आहेत, एकनाथ शिंदे आमचे जुने मित्र आहेत. तुमची रस्सी भाजपवाले कधी जाळतील याकडे लक्ष ठेवा. आगीशी खेळत आहात, आम्ही वाचलोय, आमची रस्सी आम्ही पुन्हा नव्याने वळू आणि त्याचा फासही करू. तो कोणाच्या गळ्यात टाकायचा ते टाकू, आम्ही स्वाभिमानाने बाहेर राहिलो. तुम्ही सगळे लाचारीच्या मार्गाने चालला आहात. त्याला स्वाभिमान म्हणत नाही, इतिहासातील दाखले आम्हाला देऊ नका. आम्ही तुम्हाला आणि तुमच्यासोबत असणाऱ्यांनाही ओळखतो. जे पळून गेले, डरपोकप्रमाणे त्यांनी अशी भाषा करण बरोबर नाही, असं संजय राऊत म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed