• Mon. Mar 9th, 2026

    बांगलादेशींविरुद्ध बडगा; ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ जणांना अटक, नऊ गुन्हे दाखल

    बांगलादेशींविरुद्ध बडगा; ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ जणांना अटक, नऊ गुन्हे दाखल

    Thane News: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    thane police3

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. याप्रकरणी ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, बांगलादेशींना भाड्याने घर देणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

    अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी नागरिक असून त्याला ठाणे शहरातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तसेच संपूर्ण जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट झाल्याचे समोर आले आहे. भारतात घुसखोरी केल्यानंतर बांगलादेशी नागरिक शहरांकडे धाव घेतात. याठिकाणी ते मजुरीसह अन्य कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून येते. गंभीर बाब म्हणजे, त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड असते. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही कागदपत्रे बनवून घेतली जात असून काही बांगलादेशी नागरिक वर्षांनुवर्ष भारतात राहत असूनही त्यांचा शोध लागत नाही. परंतु, सध्या ठाणे पोलिसांनी बांगलादेशींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
    अमित शहांनी भुजबळांना दिली शिंदेंची खुर्ची, सहकार परिषदेतील गुफ्तगूमुळे चर्चांना उधाण, कानात काय सांगितलं?
    गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांनी बांगलादेशींची धरपकड चालू केली असून जानेवारीत पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये हे बांगलादेशी नागरिक सापडले आहेत. भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून एका बांगलादेशी नागरिकास अटक केली आहे.
    लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज! ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे होणार जमा, १५०० की २१००? जाणून घ्या
    कल्याण परिमंडळातील कोळशेवाडी, महात्मा फुले चौक, मानपाडा, बाजारपेठ या पोलिस ठाण्यात पाच गुन्ह्यात ११ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात दोन बांगलादेशी नागरिक पकडले गेले आहेत. ठाणे शहरातील वर्तकनगर आणि कापुरबावडी ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोन बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed