Pune News: शहरात सध्या पावणेदोन लाख रिक्षा असून, दोनशे ते अडीचशे रिक्षांमागे एक थांबा अशी स्थिती आहे. ‘आरटीओ’ परवानाधारक रिक्षांची संख्या एक लाख २९ हजारांच्या पुढे गेली आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ४२ हजार परवानाधारक रिक्षा आहेत.
असे तयार होतात रिक्षाथांबे
शहरात दिवसेंदिवस रिक्षांची संख्या वाढत आहे. संख्या वाढत असल्याने रिक्षा उभ्या करायच्या तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आठ ते दहा रिक्षा चालक एकत्र येऊन संघटना स्थापन करीत आहेत. मोक्याच्या ठिकाणी, मुख्य चौकात, एसटी स्थानकाबाहेर, रेल्वे स्थानकांबाहेर आणि मेट्रो स्थानकांबाहेर पाटी लावून रिक्षाथांबा सुरू केला जातो. या थांब्यांसाठी कोणाचीही परवानगी घेतली जात नाही. थांबा सुरू झाल्यानंतर रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
अमित शहांनी भुजबळांना दिली शिंदेंची खुर्ची, सहकार परिषदेतील गुफ्तगूमुळे चर्चांना उधाण, कानात काय सांगितलं?
नियम काय सांगतो?
दोन रिक्षा थांब्यांमध्ये किमान १०० मीटर अंतर असावे किंवा नागरिकांच्या गरजेनुसार थांबा असावा, असा नियम आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी एकमेकांच्या शेजारीशेजारी रिक्षा थांबा असल्याचे दिसून येते.
थांब्यांसाठी सर्वेक्षण नाहीच
‘आरटीओ’, वाहतूक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामार्फत सर्वेक्षण केले जाते. हा अहवाल ‘आरटीओ’ मार्फत प्रादेशिक परिवहन समितीसमोर (आरटीए) ठेवला जातो. त्यानंतर समितीकडून मान्यता मिळते किंवा नकार दर्शवला जातो. ‘आरटीए’ समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) सचिव, सदस्यपदी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराचे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त असतात. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून रिक्षा थांब्यांसाठी सर्वेक्षण झाले नसल्याचे समोर आले आहे.
PMP बसचा आरसा तोडला, चालकाने बाईकवरुन पाठलाग करत अडवलं, पण शेवट भीषण झाला
रिक्षांच्या संख्येत वाढ का?
पुण्यातील अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या पेठांमुळे रिक्षातून प्रवास करण्यावर नागरिकांचा भर असतो. सन २०१७पासून पुण्यातील रस्त्यांवर रिक्षांची संख्या वाढू लागली. केवळ पुण्यातच नव्हे, तर अन्य शहरांमध्येही रिक्षांची संख्या झपाट्याने वाढली. ही वाढ होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे, ‘मागेल त्याला परवाना
वाढत्या रिक्षांमुळे उपासमारीची वेळ
‘पूर्वी आम्हाला दिवसा एक हजार रुपये मिळायचे, त्या वेळी सीएनजीचा खर्च वजा जाता ५०० रुपये शिल्लक राहायचे. मात्र, आता रिक्षांच्या वाढलेल्या संख्येमुळे दिवसभरात ५००-६०० रुपयेच मिळतात. त्यातही सीनएजी महागल्याने त्याचा खर्च जाऊन २०० ते २५० रुपयेच उरतात. इतक्या कमी उत्पन्नात खर्च कसे भागवायचे,’ असा सवाल रिक्षाचालक करीत आहेत. मुक्त परवान्यांच्या धोरणामुळे रिक्षांची संख्या बेसुमार वाढली असून, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी वाढली आहे. रिक्षा वाढल्याने चालकांचे उत्पन्न न वाढता त्यात घटच झाली आहे. त्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज! ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे होणार जमा, १५०० की २१००? जाणून घ्या
शहरात रिक्षांची संख्या वाढव असर्वेक्षणच झालेले नाही. त्यामुळे अनेक चौकात रिक्षाथांबे नाहीत. रिक्षा थांबे वाढविण्यासाठी मागणी केली आहे. – बापू भावे, रिक्षा फेडरेशन
आरटीओकडून लवकरच रिक्षा थांबे वाढविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्षा थांबे वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
ज्या प्रमाणात रिक्षांची संख्या वाढली आहे, त्या प्रमाणात रिक्षाथांबे वाढले पाहिजेत. २२ रिक्षाथांब्यांसाठी अर्ज दिला आहे. त्यातील एकही अर्ज अद्याप मंजूर झालेला नाही. –आनंद तांबे, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान
शरद पवारांनी सहकार मोडीत काढला! केंद्रीय गृहमंत्री शहा यांची मालेगावात टीका
१,२९,०००- पुण्यातील एकूण रिक्षा
५४०- पुण्यातील रिक्षा थांबे
४२,६००- पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा
१५०- पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा थांबे

