• Tue. Mar 10th, 2026
    प्रजासत्ताकदिनी दिल्लीत दिसणार साताऱ्यातील ‘मधाचे गाव’ मांघर, पण गावकऱ्यांनाच नाही निमंत्रण!


    मांघर… राज्यातीलच नाही तर देशातील पहिलं वहिलं ‘मधाचे गाव’… या गावातील प्रत्येत घरात मधपाळ असून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्ववर तालुक्यात हे वसलेलं आहे… १६ मे २०२२ रोजी मांघर गावाला देशातील पहिले मधाचे गाव असा सन्मान मिळाला. पुढे स्मार्ट व्हिलेज असलेल्या मांघरने निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण विकासरत्न, एक गाव एक गणपती, लोकग्राम असे एक ना अनेक पुरस्कार पटकावले आहेत. सातारा जिल्ह्यात मधाच्या एकूण उत्पादनापैकी दहा टत्के उत्पादन मांघरमध्ये होते. सुरुवातीला गावातील लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. मग त्यांना मधपेट्या देण्यात आल्या. वन विभागाच्या साहाय्याने मधमाशीपूरक वनस्पतींची लागवड देखील केली गेली. गावात मधमाशीचे मधुबन, माहिती दालन, प्रचार, प्रसिद्धी आणि विक्री केंद्र उभारले गेले.. आणि आता गावात मध उत्पादन प्रशिक्षण केंद्रदेखील उभारले गेलेय.. मांघरगावाला मधाचे गाव असा सन्मान मिळाल्यापासून अनेक पर्यटकांनीही गावात भेटीगाठी दिल्या आहेत. प्रत्येक वर्षी या गावात लाखो पर्यटक भेट देतात. दरम्यान आता हे गाव चर्चेत आलंय ते एका वेगळ्या कारणासाठी… येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर होणाऱ्या भारत पर्व प्रदर्शनातील चित्ररथात महाराष्ट्राच्यावतीने ‘मधाचं गाव’ असलेलं मांघर या चित्ररथात सहभागी होणार आहे. आणि ही महाबळेश्वर तालुक्यासाठीच नव्हे तर मधउत्पादक असलेल्या शेतकऱ्यांसह राज्यासाठीही अभिमानाची बाब आहे… मांघरमधील गावकऱ्यांशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी संतोष शिराळे यांनी….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed