• Tue. Mar 10th, 2026

    मतांसाठी भाजपने फसवलं, जमिनी घ्यायचा प्रयत्न केल्यास ठिय्या आंदोलन करू; शक्तिपीठ महामार्गाला विरोध

    मतांसाठी भाजपने फसवलं, जमिनी घ्यायचा प्रयत्न केल्यास ठिय्या आंदोलन करू; शक्तिपीठ महामार्गाला विरोध

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2025, 10:01 am

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. निवडणुकी दरम्यान भाजपने मतांसाठी खोटी आश्वासन दिली, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. शक्तिपीठ महार्गाच्या प्रस्तावित रस्त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. अर्धापूर तालुक्यातील जमीन ही बागायती असून भरघोस उत्पादन इथले शेतकरी घेत असतात. मात्र महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतात घोषणाबाजी केली. रस्त्यासाठी जमीन विकून आम्हाला गोव्याला दारू प्यायला जायचे नाही अश्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. या महामार्गविरोधात साखळी उपोषण सुरु करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *