• Sat. Jun 6th, 2026

    हरभऱ्यावर घाटेअळीचे संकट; फुलंब्रीत ढगाळ वातावरणामुळे प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

    हरभऱ्यावर घाटेअळीचे संकट; फुलंब्रीत ढगाळ वातावरणामुळे प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

    Contributed by गणेश जाधव | Authored byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 17 Jan 2025, 3:07 pm

    ​​Phulambri News: फुलंब्री तालुक्यातील सहा हजार ४४० हेक्टरवर हरभऱ्याचे पीक असून, तालुक्यातील अनेक भागांत हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याने दिसून येत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    हरभरा

    गणेश जाधव, फुलंब्री : वातावरणामुळे तालुक्यातील अनेक भागांत हरभरा पीक फुलोऱ्यावर आले आहेत, तर काही भागांत घाटे अवस्थेत आहे. मात्र, तालुक्यात काही ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

    फुलंब्री तालुक्यातील सहा हजार ४४० हेक्टरवर हरभऱ्याचे पीक असून, तालुक्यातील अनेक भागांत हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याने दिसून येत आहे. विशेषतः पीक फुलोरा फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत असताना घाटेअळीचा प्रादुर्भाव होणे ही बाब नुकसानकारक ठरत आहे. वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या हरभऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ लॅम्बोर्गिनी कारबाबत विखे पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कारमध्ये रोहित पवार…
    यंदा रब्बी हंगामातील हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. पिकाच्या निगराणीसाठी मेहनत घ्यावी लागत असताना अळ्यांचे विघ्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फवारणीसाठी पदरमोड करावी लागत आहे. तालुक्यात खरीप हंगामातील यंदा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील २९ हजार ६५० क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. यापैकी सहा हजार ४४० क्षेत्रात हरभरा पीक आहे, तर तेरा हजार २४९ हेक्टरवर गव्हाचे आहे. यंदा बऱ्यापैकी हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे, तालुक्यात सर्वत्र पाण्याची उपलब्धता असल्याने भारनियमनच्या वेळेनुसार दिवसा आणि रात्री पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी मेहनत घेताहेत. आता शिवार हिरवाईने बहरले जात असताना अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर आळीचा प्रार्दुभाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागड्या फवारणीचे नियोजन सुरू केले आहे.
    भाऊ की वैरी? जुगारात गमावली पाच एकर जमीन; उधारी चुकविण्यासाठी बहिणीच्याच घरी डल्ला, पिंपरीतील घटना
    गत दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. घाटेअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील काही वर्षांपासून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. भाऊसाहेब कदम, शेतकरी
    प्रसिद्ध हॉटेल फोडलं, पण फक्त ३० रुपये हाती; मग चोरट्यांनी असं काही केलं की मालक शॉक, घटना CCTVमध्ये कैद
    अवकाळी पावसामुळे अरकार कर हातचे गेले आहे. त्यामुळे सर्व मदार रब्बी पिकांवर आहे. मात्र, हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. बाळकृष्ण जाधव, शेतकरी

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed