• Wed. Mar 18th, 2026
    सैफला अर्धांगवायूचा धोका?  डॉक्टर म्हणाले जर…

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Jan 2025, 11:06 am

    Saif Ali Khan Attack : सैफ मुंबईतील लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अशातच डॉक्टरांनी एक नवे विधान केले आहे. डॉक्टर म्हणाले की, जर चाकू थोडा खोल गेला असता तर सैफला अर्धांगवायू होऊ शकला असता.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : सैफ अली खानची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. गुरुवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरात घुसून,सैफवर चाकूने हल्ला केला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. सैफचे चाहते त्याच्या तब्येतीच्या अपडेट्सवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, आता घाबरण्याची गरज नाही. सैफ मुंबईतील लीलावती रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अशातच डॉक्टरांनी एक नवे विधान केले आहे. डॉक्टर म्हणाले की, जर चाकू थोडा खोल गेला असता तर सैफला अर्धांगवायू होऊ शकला असता.

    सैफ अली खानच्या शरीरावर सहा ठिकाणी वार करण्यात आले असून, त्यापैकी दोन जखमा खूप खोल आहेत. नितीन डांगे यांनी सैफ अली खानवर उपचार केले आहेत. सैफच्या तब्येतीची अपडेट शेअर करताना त्यांनी सांगितले की, तो आता ठीक आहे. डॉ. डांगे म्हणाले, “या हल्ल्यात त्याला चार खोल जखमा झाल्या आणि दोन किरकोळ जखमा झाल्या. यापैकी एका चाकूचा २.५ इंचाचा तुकडा त्याच्या पाठीत घुसला होता. जर चाकू त्याच्या पाठीत खोलवर गेला असता तर, त्यामुळे अर्धांगवायू होऊ शकला असता. परंतु सुदैवाने सैफला कोणत्याही मोठ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागला नाही.”

    दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज

    डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सैफ अली खानला येत्या दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळेल. आता त्याची फिजिओथेरपी सुरू होणार आहे. सैफ अली खान आठवड्याभरात त्याच्या चित्रपटांचे शूटिंग सुरू करू शकेल, असेही डॉक्टर म्हणाले. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    तर अर्धांगवायूचा त्रास होऊ शकला असता

    डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, सैफच्या पाठीत खुपसलेला चाकू जर खोलवर गेला असता तर, त्याला अर्धांगवायूचा त्रास होऊ शकला असता. म्हणजे त्याच्या शरीराचा कोणताही भाग काम करणे थांबवू शकला असता. ज्यामुळे, त्याची फिल्मी कारकीर्द संपुष्टात आली असती.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed