• Thu. Sep 17th, 2026
Good News! ठाणेकरांचा प्रवास आता आणखी जलद, समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती मिळणार; CM फडणवीसांची माहिती

Samruddhi Highway final phase accelerates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी द्रुतगती महामार्गाबाबत गुडन्यूज दिली आहे. समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : पाच वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी द्रुतगती महामार्गाबाबत गुडन्यूज दिली आहे. समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबई आणि नागपूरला थेट कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी या एक्स्प्रेसवेच्या शेवटच्या भागाचे काम लवकर पूर्ण होणार असल्याचेही ते म्हणाले. मेट्रोच्या बांधकामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी बैठक घेतली होती. आता त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) विस्ताराशी संबंधित प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समृद्धी एक्स्प्रेसवेचा समावेश आहे. २०१४मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी पहिल्या टर्ममध्ये या एक्स्प्रेसवेचे काम सुरू केले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गाचा इगतपुरी ते ठाणे दरम्यानचा अंतिम टप्पा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. ज्याची एकूण लांबी ७६ किलोमीटर आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाला पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि खनिज समृद्ध गडचिरोली जिल्ह्याला जोडण्याचे काम जलद गतीने करण्यास सांगितले आहे. नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा रस्ता महायुती सरकारने आपल्या गत कार्यकाळात वाहतुकीसाठी खुला केला होता. ज्यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी नागपूर ते गडचिरोली या १५६ किमी आणि इगतपुरी ते वाढवण बंदर या १३४ किमी लांबीच्या रस्त्याच्या टेंडर प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्याचे निर्देश दिले आहेत.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, इगतपुरी ते ठाणे या विभागातील ७.७८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. आतील रहदारीसाठी उघडण्यास सक्षम. गायकवाड म्हणाले की, नागपूर ते गडचिरोली या १५६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठीची आर्थिक निविदा पूर्ण झाली आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही नागपूर ते गडचिरोली विभागाचे काम सुरू करू.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed