Latur Crop Insurance Scam: शेतकऱ्यांचा पीकविमा बोगस शेतकऱ्यांनी लाटून त्याची कोट्यवधींची रक्कम बीड जिल्ह्यातील परळी आणि धर्मापुरी बँकेतील खात्यात वळविण्यात आली,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी केला.
अवकाळी आणि विविध कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्यात येते. योजनेतून केवळ एक रुपयात पीकांचा विमा उतरवून मिळतो. परंतु, निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी गेलेल्या राष्ट्रवादी-शप पक्षाच्या युवक शाखेला लातूरमधील शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांना विम्याची रक्कम मिळालेलीच नाही. तक्रारी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील युवकांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आणि गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना त्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे का, हेही विचारण्यास सुरुवात केली त्यानंतर या घोटाळ्याची माहिती पुढे आल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला.
Nashik Politics: महाविकास आघाडीला नाशिकमध्ये धक्का! कांबळे, पगारे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
‘तक्रारी आल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली असता रेणापूर तालुक्यातील हणमंतवाडी, काळेवाडी, पानगाव याच बरोबरीने लातूरशेजारील नांदेड, परभणी, बीड व जालना जिल्ह्यातही हाच प्रकार असल्याचे दिसून आले,’ असे राष्ट्रवादी-शप युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांगितले. विशेष म्हणजे, विविध गावच्या शेतकर्यांच्या जमिनीवर परळीमधील ओम आंधळे, भाग्यश्री गित्ते, धनंजय लटपटे, गणेश क्षीरसागर, मुक्ता होळंबे, शरयू गंगा फड, समाधान आंधळे, शिवाजी कातकाडे, श्रीनाथ मुंढे, सूर्यभान शिंदे आदी लोकांच्या नावे विमा भरून ही विमा रक्कम त्यांच्या परळी व धर्मापुरी येथील बँक खात्यावर वळती करून घेतलेली आहे, असेही साळुंखे म्हणाले.
परळीत बोगस मतदान; मतदारांच्या बोटाला शाई, ती गॅंग बटण दाबायची, VIDEO शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा आरोप
‘केंद्र, राज्य सरकारचीही फसवणूक’
‘शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम लाटून ती परळी आणि परिसरात नेली असून फक्त शेतकरीच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारची फसवणूक केली आहे. सर्वसामान्यांच्या करातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या विम्याची रक्कम लाटून लोकांचीही फसवणूक झाली आहे. त्याचे सर्व पुरावे उपलब्ध असून याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधोरेखित करत याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे,’ असे साळुंखे यांनी स्पष्ट केले.

