• Thu. Mar 12th, 2026

    २० वर्षे देशसेवा, निवृत्तीनंतर लगेच काळाचा घाला, जवानाचा मनाला चटका लावणारा मृत्यू, कारण काय?

    २० वर्षे देशसेवा, निवृत्तीनंतर लगेच काळाचा घाला, जवानाचा मनाला चटका लावणारा मृत्यू, कारण काय?

    Pramod Patil Marathi News : २० वर्षे देशसेवा केल्यावर निवृत्तीनंतर काळाने घाला घातला. या घटनेने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जवानाचा मनाला चटका लावणारा मृत्यू असून नेमकं काय घडलं जाणून घ्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    धुळे : धुळ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा मृत्यू झालाय, २० वर्षे देशसेवा केल्यावर निवृत्तीनंतर काळाने घाला घातला. या घटनेने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. प्रमोद रमेश पाटील असं त्यांचं नाव मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. नेमकं काय घडलं? ज्यामुळे जवानाचा मृत्यू झाला जाणून घ्या.

    धुळे तालुक्यातील गोंदूर येथील एका सेवानिवृत्त जवानाचे सकाळी व्यायाम करताना आलेल्या ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले. त्यांच्या या दुर्दैवी निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर गोंदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गोंदूर येथील सर्वसाधारण कुटूंबातील जवान प्रमोद रमेश पाटील (वय ४१) हे अतिशय कठीण परिश्रम करून सैन्य दलात दाखल झाले होते. तब्बल २० वर्षे देशातील विविध ठिकाणी खडतर ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडून देश सेवा करून दीड वर्षांपूर्वी घरी परतले होते. मात्र ७ जानेवारीला पहाटे व्यायाम करीत असताना ते चक्कर येऊन पडले यावेळी त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला धुळे आणि नंतर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.

    १० डिसेंबरला सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर गोंदूर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. प्रमोद पाटील हे सेवानिवृत्त होऊन घरी आल्यावर शेती कामातही कुटूंबाला मदत करत असे त्यांनी मुंबई पोलीस दलात मैदानि चाचणी पूर्ण केली होती ते आता अंतिम पेपरची तयारीत होते मात्र त्यांना काळाने हिरावून नेले.

    प्रमोद पाटील हे धुळे शहरातील सुंदर नगर येथे वास्तव्यास होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नियमित आणि नित्त्याने व्यायाम करीत आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्यांचा प्रयास होता परंतु नियतीला हे मान्यच नव्हते त्यांच्या परिवारावर आलेल्या या क्रूर आणि दुःखातून सावरण्यासाठी मोठ्या आणि खंभिर मनाने उभे रहावे लागेल.

    अजय गर्दे

    लेखकाबद्दलअजय गर्दे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये धुळे जिल्ह्यात फ्रिलान्सर प्रतिनिधी म्हणून कार्यरत. 8 वर्षांपूर्वी वृत्तवाहिनीतून पत्रकारितेची सुरुवात. आवाज Tv चॅनल, सोबत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed