• Thu. Jun 18th, 2026

    बापू आंधळे खून प्रकरण! विधानसभेत फडणवीसांनी समर्थन केलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर आव्हाडांचा गंभीर आरोप

    बापू आंधळे खून प्रकरण! विधानसभेत फडणवीसांनी समर्थन केलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर आव्हाडांचा गंभीर आरोप

    Jitendra Awhad News on bapu aandhale murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असताना आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरपंच बापू आंधळेंच्या खून प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. नेमका काय आरोप केलाय आणि त्यांचा फडणवीसांसोबत काय संबंध जाणून घ्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली करण्यात आली होती. हिवाळी विधानसभा अधिवशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांनी देशमुख यांची हत्या झाल्यावर फास्ट अॅक्शन घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांचे घटनास्थळावर लोकेशन असल्याचं फडणवीस म्हणाले होते. मात्र या अधिकाऱ्यांवर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. सरपंच बापू आंधळेंच्या खूनामध्ये कराडांचं नाव असल्याचं सांगत आव्हाडांनी महाजनांवर निशाणा साधला आहे.

    सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. घाणेरडा, विकृत क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणाचा प्लॅनर आहे. गेल्या १० वर्षात तिथे जेवढे खून झाले आहेत त्यातील ८० टक्के खून हे वाल्मिक कराडे प्लॅनिंग करून केले आहेत. तो विकृत, सायकोपॅथ सीरीअल किलर आहे. मी बापू आंधळेची एफआयर पाठवली असून त्यामध्ये कराड आरोपी आहे. महाजन ज्यांची सरकारने बदली केलीय त्यांनी का कराडला आजपर्यंत अटक का केली नाही. त्याला का मोकळं सोडलं होतं? हेच महाजन संतोष देशमुख प्रकरण झालं त्यावेळी केजला असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

    संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर सरकारने प्रकाश महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. महाजन यांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप केला गेला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

    बापू आंधळे खून प्रकरण

    अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा २९ जून २०२४ ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आलेली. परळी शहरामधील बँक कॉलनी भागात त्यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणामध्ये बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने आरोपींना जामीनावर सोडले होते मात्र बबन गित्ते अजूनही फरारच आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed