• Sun. Sep 13th, 2026
मनसेने थैमान घातलं तर बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा, ‘लाडकी बहीण’च्या नावे मतं मागणारे…

Raj Thackeray on Kalyan Dispute : महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातले तर आमच्याकडे बोट दाखवू नका’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर दिला.

Raj Thackeray : मनसेने थैमान घातलं तर बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा थेट इशारा, ‘लाडकी बहीण’च्या नावे मतं मागणाऱ्यांनी…

मुंबई : कल्याणमध्ये एका सोसायटीत झालेल्या मराठी-अमराठी वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदू म्हणून आज आपण एकत्र आले पाहिजे हे ठीक आहे, परंतु हिंदूंना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हेदेखील आपण पाहिले पाहिजे. कल्याण प्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि सरकारला जमत नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातले तर आमच्याकडे बोट दाखवू नका’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर दिला.

महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला

‘कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतरही माझे महाराष्ट्रसैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्तपणे राहात आहेत,’ असे राज ठाकरे म्हणाले.
Devendra Fadnavis : परभणीतील आरोपी मनोरुग्ण, सुर्यवंशींना मारहाण नाही, PI होरबांड सस्पेंड, फडणवीसांनी सांगितलेला घटनाक्रम वाचा जसाच्या तसा

मराठी माणसा आता तरी जागा हो

‘मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येक वेळेला हे असे महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असंही नाही की महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. परंतु ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणारही नाही,’ असे या पोस्टमध्ये नमूद केले.
Avinash Jadhav : शुक्ला प्रकरणात मराठी आमदार आवाज उठवणार? की तेही मराठी भय्ये झालेत? अविनाश जाधवांनी सुनावलं
राज ठाकरे यांनी लिहिलेली संपूर्ण पोस्ट इथे वाचा

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभवआणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed