• Thu. Sep 17th, 2026

Donkey Wedding : अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हणत झालं गाढवाचं लग्न, पावसासाठी माढ्यात गाढवाचा विवाह

माढ्यात अंतरपाट धरुन मंगलाष्टका म्हणत गाढवाचा आगळावेगळा विवाहसोहळा पार पडला. यावेळी गुलालदेखील उधळण्यात आला. माढ्याच्या मोडनिंब गावात पार पडलेल्या या विवाहाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. पण हे लग्न घडवून आणण्यामागचे कारण हे भावनिक आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अरुण बाबर, सोलापूर : माढ्यात सध्या एका अनोख्या लग्नाची प्रचंड चर्चा होत आहे. आपण ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट येण्याआधी रंगभूमीवर ‘गाढवाचं लग्न’ नावाचं गाजलेलं नाटक होतं. अतिशय विनोदी आणि मनोरंजन करणारं हे नाटक होतं. तसेच अभिनेता मकरंद अनासपूरे यांची मुख्य भूमिका असलेला ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपटदेखील प्रचंड गाजला होता. आता हा चित्रपट आठवण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. कारण सोलापूरच्या माढा तालुक्यातील एका गावात गावकऱ्यांनी खऱ्याखुऱ्या गाढवांचं लग्न लावून दिलं आहे. यामागे एक जुनी परंपरा असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस पडत नसल्याने गाढवाचं लग्न लावून दिल्याचं बोललं जात आहे.

राज्यात यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला. माढा तालुक्यात तर पाऊसच नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह माढा तालुक्यात पाऊस पडावा, यासाठी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ग्रामपंचायत समोर चक्क गाढवाचे लग्न लावण्यात आले. पूर्वीच्या काळी दुष्काळजन्य परिस्थितीत गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो, अशी आख्यायिका सांगितली जात होती.

Maharashtra TimesManoj Jarange : शांततेत आंदोलन करु असा अमृताताईंना माझा शब्द, मनोज जरांगे यांचं मिसेस मुख्यमंत्र्यांना आश्वासन

मंगलाष्टका म्हणत आणि अक्षदा टाकून गाढवाचा विवाह संपन्न

यानुसार रविवारी मोडनिंब ग्रामपंचायतीच्या समोर दोन गाढवांना एकमेकांसमोर आणून आंतरपाट धरत, मंगलाष्टका म्हणून अक्षदा टाकून विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी गाढवांच्या अंगावर गुलाबाचीही मुक्त उधळण करण्यात आली. त्यामुळे गाढवाचं लग्न लागल्यावर तरी मोडनिंब गावासह माढा तालुक्यात पाऊस पडावा, अशा अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.

Madha news

पावसासाठी गाढवाचेही लग्न लावले. आता तरी पाऊस पडू दे. सध्या सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती आहे. गेले दोन महिने पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने पिण्याच्या पाण्याचीदेखील भीषण टंचाई जाणवू लागली आहे. अशात आता शेतकरी वर्ग पूर्वीच्या जुन्या अंधश्रद्धांकडे वळू लागला आहे.

Maharashtra TimesAmit Shah : 2029 आधी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करु, अमित शाह यांची घोषणा

माढ्यात दुष्काळजन्य परिस्थिती

मोडनिंब येथे रविवारी पावसासाठी थेट गाढवाचे लग्नही लावण्यात आले. माढा आणि परिसरात भीषण पाणीटंचाईच्या सामना सध्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यातूनच पूर्वी दुष्काळजन्य परिस्थिती आल्यावर गाढवाचं लग्न लावण्यात यायचे आणि त्यानंतर पाऊस पडायचा अशी समज होती. त्याच पद्धतीने मोडलिंब ग्रामस्थांच्या वतीने आज ग्रामपंचायत समोर गाढवांचे लग्न लावून भगवंताला साकडे घालण्यात आलं. शेतकऱ्यांच्या जनावरांनादेखील पिण्यासाठी पाणी मिळत नसून लवकरात लवकर पाऊस पडावा, अशी प्रार्थना करत गाढवाचे लग्न लावण्यात आले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा