Maharashtra Cabinet Expansion : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे ‘शक्ती’प्रदर्शन, तीन बड्या चेहऱ्यांना ताकद
विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपचे १५ तर, शिवसेनेचे सहा आमदार जिंकले. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून मुंबईत कुणाला प्रतिनिधित्व मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच शिवसेनेकडून मागील सरकारमध्येही मुंबईतून एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नव्हते.
शिवसेनेकडून मुंबईकडे दुर्लक्ष
शिवसेनेतील मागाठाणे येथून तिसऱ्यांदा निवडून आलेले प्रकाश सुर्वे हे निष्ठावान म्हणून त्यांना संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. तर दुसरीकडे, चांदिवलीमधून निवडून आलेले दिलीप लांडे यांनी दोन वेळेस नगरसेवक आणि दोनवेळा आमदारकी पटकावली आहे. कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर सलग तिसऱ्या वेळेस निवडून आले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला संधी मिळेल का, याची शिवसेनेत चर्चा होती. तसेच या सरकारमध्ये तरी मंत्रिपद मिळणार का, यावरही चर्चा सुरू होती.
Ravi Rana : मंत्रिपद हुकलं, रवी राणा नाराज झाल्याची चर्चा, नागपूर सोडून घरी रवाना, फडणवीस समजूत काढणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मुंबई शहराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना पक्षाने मंत्रिपद दिले होते. परंतु, त्यानंतर पक्षाने मुंबईकडे मंत्रिपद दिले नाही. यंदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे एकूण ४१ आमदार निवडून आले असून मुंबईतील तीन उमेदवारांपैकी केवळ सना मलिक अणुशक्तिनगर येथून जिंकल्या. मात्र, पक्षाने आदिती तटकरे यांना संधी दिल्याने मलिक यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाही.
Devendra Fadnavis : देवाभाऊंकडून विश्वासघात! २० हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; ५० हजारांच्या मताधिक्यानंतरही फडणवीसांनी शब्द फिरवला
भाजपकडून दोन मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष
भाजपतर्फे मागील सरकारमध्ये मलबार हिल मतदारसंघातून निवडून आलेले मंगलप्रभात लोढा हे एकमेव मंत्री होते. तर कुलाब्यामधील आमदार राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन महत्त्वाची जबाबदारी दिली होती. याहीवेळी नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी पक्षाने पसंती दिली. तसेच पक्षाने मुंबई उपनगर जिल्ह्यातही आशीष शेलार यांच्या रूपात मंत्रिपद दिले आहे. शेलार हे वांद्रे पश्चिम येथून सलग दुसऱ्या वेळेस निवडून आले आहेत. शेलार हे मुंबई भाजपचेही अध्यक्ष असून त्यांना मंत्रिपद देऊन शहरात पक्षाची ताकद वाढवली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मंत्रिपद आणि महत्त्वाचे पद देऊन शहरावर लक्ष केंद्रित केले आहे.

