Devendra Fadnavis: वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही तीन दिवसीय परिषद शुक्रवारी सुरू झाली. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये हिंदू प्राचीन तत्त्वज्ञानाच्या आधारे देशाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यामध्ये राज्याच्या विकासाबाबत भाष्य केले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही तीन दिवसीय परिषद शुक्रवारी सुरू झाली. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये हिंदू प्राचीन तत्त्वज्ञानाच्या आधारे देशाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यामध्ये राज्याच्या विकासाबाबत भाष्य केले.
काँग्रेसमध्ये राजीनामासत्र? पराभवानंतर चेन्नितला, पटोले पद सोडण्याच्या तयारीत
‘तंत्रज्ञान, एआय, डिजिटायझेशन यांपासून कोणीही दूर जाऊ शकत नाही. त्याचा सकारात्मक अंगीकार करावाच लागतो. याच तंत्रज्ञानाच्या आधारे राज्याला विकसित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्राने समोर ठेवले आहे. एआय व तंत्रज्ञानाद्वारे जलसंवर्धन व वनजमीन व्यवस्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.
‘देशाला २०३०पर्यंत पाच लक्ष कोटी डॉलर म्हणजेच पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियन डॉलरचा असेल. त्यातील निम्मी अर्थव्यवस्था राज्याने आत्ताच गाठण्यात यश मिळवले आहे. राज्याच्या विकासाचा सध्याचा वेग पाहता २०२८मध्येच महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असे स्पष्ट संकेत आहेत,’ असा विश्वासही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.
मंत्रिपदाची लॉटरी कोणाला? विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी; फरांदे, हिरे, ढिकले, आहेरांच्या नावांची चर्चा
‘हिंदू तत्त्वज्ञानाच्या आधारे सर्वसमावेशक विकासाचा पाया दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रचला; तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील १० वर्षांत २५ कोटी लोकसंख्या गरिबीतून बाहेर आली आहे. हाच हिंदू आर्थिक विकासदर आता सकारात्मक ठरत आहे,’ असे मतही फडणवीस यांनी मांडले.
फोरमचे स्वामी विज्ञानंद, टी. मोहनदास पै, परिषदेचे अध्यक्ष राजेश शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक, संघ परिवारातील उच्चाधिकारी उपस्थित होते.

