Bajrang Sonawane meets Amit Shah : मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यांना बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे, असं बजरंग सोनवणे म्हणाले
आरोपीला अटक केली म्हणजे कुणीतरी साईडचे हिरो आहेत, दाखवायचे म्हणून त्यांना अटक करुन दाखवले आहे, मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. माझा पोलिसांवर भरोसा नाही. मोबाईल सापडले म्हणतात, परंतु ते जाहीर करत नाहीत. किंवा जबाबात काय म्हटले, हे देखील सांगत नाहीत. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे, याला माझे समर्थन आहे परंतु त्याआधी आरोपी अटक करणे गरजेचे आहे, असे सोनावणे म्हणाले.
Uddhav Thackeray : निकालाच्या आदल्या रात्रीच वांद्र्याचे लोक ‘कोट’ घालून झोपलेले, पण… उदय सामंतांचा निशाणा
मला असे वाटते, की ज्यांना कशात पण राजकारण करायचे आहे, त्यांना ते राजकारण दिसत आहे. जसा चष्मा घातला तसे दिसत आहे. काय राजकारण केले आहे? बजरंग सोनवणे यांनी गुन्हेगाराला अटक करावी म्हणून आवाज उठवला तो हक्क नाही का? जनतेने आवाज उठवला त्यात काय राजकारण आहे? यात कुठलाही पक्ष नाही. ते कोणत्या पक्षाचे सरपंच कोणत्या पक्षाचे आहेत याची माहिती घ्या. कोणत्या नेत्याबरोबर काम करत होते याची माहिती घ्या. त्यानंतर विचारा बजरंग सोनवणे राजकारण केलं का ? असं ते म्हणाले.
Maharashtra Politics : गौतम अदानींच्या घरी मविआला सुरुंग लावणारी बैठक, पवारांच्या शिलेदाराची भाजपच्या बड्या नेत्याशी भेट झाल्याची चर्चा
हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी माझी मागणी आहे. मी लोकसभेत आहे त्यामुळे मागणी केली आहे. जो तो आपापल्या पद्धतीने मागणी करत आहे. तर प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा कोणाकडे तपास द्यायचा. ज्याच्याकडे दिला आहे तो तपास करत आहे. त्यांचा अधिकार आहे. तपास कोणाकडेही द्या परंतु आरोपींना अटक करा आणि योग्य शासन करा आणि फाशी द्या. परळीची किडनॅपिंग असेल, इतर घटना असतील या सर्व आरोपींना अटक करा. पाटोदा येथेही गोवर्धन सानप यांची किडनॅपिंग झाली. संशयास्पद मृत्यू झाला. बीडमध्ये गोळीबार झाला. त्याबाबत मला माहिती नाही परंतु या घटनेतील आरोपी शोधावेत, अशी मागणी बजरंग सोनवणेंनी केली.
Sharad Pawar : भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या चर्चा, शरद पवारांचा खासदार म्हणतो, होय, मी अमित शाहांना भेटलो, पण…
ज्यांच्या म्हणण्यानुसार हे राजकारण आहे, त्यांना विचारा की, राजकारण दिसते तुम्हाला. सरपंच देशमुख यांना टॉर्चर करून खून केला. पक्षीय राजकारण काय आहे. बीडला बदनाम करू नका, तुमचे भाजपचे आमदार गेले. राष्ट्रवादीचे आमदार गेले, त्यांनी काय केलं? भाजपच्या नेत्या तिकडून बोलल्या त्यांनी काय केलं? मी पालकमंत्री असताना असं झालं नाही मग आता कोणी पालकमंत्री नाही म्हणून झालं का? असा सवाल सोनवणेंनी विचारला.

