• Thu. Jul 23rd, 2026
    सिग्नल सुरु करायला उशीर, जिल्हा पोलीस अधिक्षकांचा मोठा निर्णय, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना…

    Chandrapur Two Female Police Transferred: चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक मधील सिग्नल वेळेवर सुरू करण्याची जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यांवर होती. या दोन्ही महिला पाच मिनिट उशिरा पोहोचल्या.

    हायलाइट्स:

    • सिग्नल सुरु करायला पाच मिनिट उशीर
    • जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली दोन महिला पोलिसांची बदली
    • चंद्रपूरमधील धक्कादायक प्रकार
    Lipi
    सिग्नल सुरु करायला उशीर महिला पोलीस बदली

    निलेश झाडे, चंद्रपूर : सिग्नल सुरु करायला पाच मिनिट उशीर झाल्याने पोलिस अधीक्षकांनी दोन महिला वाहतूक पोलिसांची तडकाफडकी बदली केल्याचा प्रकार समोर आला आहे. उशीर होण्याचे कारण न विचारताच पोलीस अधिक्षकांनी कार्यवाही केल्याने खळबळ माजली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार काय? याकडे लक्ष लागलं आहे.चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक मधील सिग्नल वेळेवर सुरू करण्याची जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यांवर होती. या दोन्ही महिला पाच मिनिट उशिरा पोहोचल्या. याच दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन कस्तुरबा चौकातून गेले. त्यांना वाहतूक सिग्नल बंद असल्याचे दिसले. यावर त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवत त्यांचं काही न ऐकता त्यांच्यावर कार्यवाही केली. खरंतर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना किमान याबद्दल विचारणा करायला हवी होती. त्या दोन महिलांसह वाहतूक निरीक्षकही तेवढेच दोषी आहे. वाहतूक निरीक्षकावर कुठलीच कारवाई न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यवाहीवर आता प्रश्न उपस्थित केलं जात आहे.
    नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच; तीनही घटकपक्षांचा दावा, वरिष्ठांकडे पदासाठी लॉबिंग

    ‘या’ समस्या कडेही लक्ष द्या…

    चंद्रपूर शहरातील वाहतूक शाखेचा कार्यालयापुढे खासगी बसेसच्या भल्यामोठ्या रांगा उभ्या असतात. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वाहनाकडे जाणीवपणे दुर्लक्षित केले जाते. दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षकांनी डोळे बंद केले असले तरी शिस्त पाळणारे जिल्हा पोलीस अधिक्षक यावर कार्यवाही करतील काय? अशी चर्चा आता शहरात सुरू आहे. आता त्या अधिक्षकांबाबत काय निर्णय घेतला जातो ते बघणं महत्त्वाचं असेल.

    उशीर झाला तर कार्यवाही, मारहाण झाली तर शांत…

    काही महिन्यांपूर्वी जटपुरा गेट परिसरात महिला पोलीस कर्तव्यावर असताना महिला पोलिसावर एका राजकीय पक्षातील पदाधिकारी महिलेने मारहाण केली होती, असा धक्कादायक प्रकार घडला होता. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झालेली असताना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नसल्याची चर्चा पोलीस विभागातून पुढे आली होती.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed