• Sat. Sep 21st, 2024
राष्ट्रीय पक्षांची दादागिरी, प्रादेशिक पक्षांची मोट बांधा, राज ठाकरेंकडे तिसऱ्या आघाडीची मागणी

नाशिक : महाराष्ट्रात सध्या दोन राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांवर दादागिरी करीत आहेत. प्रादेशिक पक्षांना अतिशय तुच्छतेची वागणूक देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तिसरी आघाडी स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

मनसेचे कार्यकर्ते सांगतात, दादागिरी करणाऱ्या पक्षांची मुजोरी जनता पाहात आहे. त्यांच्या मनातील ही रागाची ठिणगी मतपेटीच्या माध्यमातून वणवा पेटवणार आहे. या घाणेरड्या राजकारणाला जनता हसत असेल किंवा दूषणे देत असेल. प्रादेशिक नेत्यांचा अपमान होत असल्याची भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी कठोर निर्णय घेऊन या रागाला मोकळी वाट करून द्यावी. त्यासाठी तिसरी आघाडी निर्माण करावी, अशी भावना तयार झालेली आहे.
राज ठाकरेंचं महायुतीला समर्थन, पुण्यात मनसेच्या मतांचं विभाजन? धंगेकर-मोरे मतं खाण्याची चर्चा

‘प्रादेशिक पक्षांची बांधावी मोट’

राज ठाकरे यांनी मनसे, वंचित बहुजन आघाडी, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाज पक्ष, आम आदमी पक्ष, स्वराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे छोटे-मोठे गट, संभाजी ब्रिगेड, अशा सर्व प्रादेशिक उपेक्षित पक्षांना घेऊन तिसरी आघाडी बनवावी आणि जनतेला एक सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावा.
राज ठाकरेंच्या महायुती पाठिंब्याचे गंभीर पडसाद, मनसेत पहिला राजीनामा, सरचिटणीसाने पक्ष सोडलाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

मतदार या पर्यायाचे निश्चित स्वागत करतील, असे मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, देवचंद केदारे, संदीप दोंदे, अर्जुन वेताळ, नितीन दानापुणे, नितीन पंडित, सत्यम खंडाळे, धीरज भोसले, नितीन माळी, भाऊसाहेब निमसे, रोहन जगताप आदींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed