• Sat. Sep 21st, 2024
कोण कुठला महादेव जानकर… साताऱ्याहून का आलास बाबा? सेना उमेदवार संजय जाधव यांची सडकून टीका

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधक आता जातीजातीत भांडणे लावण्याचे काम करू शकतात. कारण त्यांच्याकडे निवडणुकीत लढण्यासाठी कसल्याही प्रकारचा मुद्दा राहिलेला नाही. कोण कुठला साताऱ्यामधला महादेव जानकर तो परभणीमध्ये येऊन निवडणूक लढवतो…. का आलास बाबा? उद्या इथल्या नागरिकांचं पोलीस ठाण्यामध्ये काही काम असेल तर साताऱ्याहून करणार काय..? किंवा आरटीओ, दवाखान्याचे काम असेल तर ते काम कसे करणार? अशी विचारणा करताना मी शिवसैनिक आपल्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याचे संजय जाधव यांनी जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील ग्रामस्थांशी खासदार संजय जाधव बोलत होते. यावेळी डॉक्टर सेलचे डॉ राम शिंदे,उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे, तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, जि.प.चे माजी सदस्य माणिकअप्पा घुंबरे, युवासेनेचे अविराज टाकळकर, पांडुरंग शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य पिंकू शिंदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार घुंबरे, युवक काँग्रेसचे डॉ. महेश कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती.
आधी मोदींवर टीका, नंतर थेट राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल, मविआचे खासदार भाजपवर बरसले

पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख प्रामाणिकपणे राज्य चालवत असताना काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेना पक्षाची चिन्हासह चोरी करत उद्धव ठाकरे संपल्याची भाषा करणारे गद्दार मात्र सकाळी उठल्यापासून उद्धव साहेबांवर टीका करतात. संपलेल्या माणसावर टीका कशाला करता? मात्र आता जनता तुम्हाला संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
पक्षासाठी १०० केसेस अंगावर घेत मुख्यमंत्रीपद, सेना वाचवण्यासाठी उठाव, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

भाजप सरकारच्या घोषणा म्हणजे नुसती जुमलेबाजी असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणणारे प्रत्यक्षात शेती मालाचे भाव पाडून राहिल्याने आज शेतकरी मोठ्या संकटात सापलेला आहे. खताच्या किमती भरमसाठ वाढवल्या त्यात दहा किलो खत कमी हे भाजप सरकार म्हणजे नुसते लुटारू असल्याची जाधव यांनी केली.
मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांपूर्वी मोठं ॲापरेशन केलं, काही लोकांचे कमरेसह गळ्याचे पट्टे उतरवले, शिंदेंचा ठाकरेंना टोला

अब की बार चारसौ पार म्हणणारे इतर पक्षांची फोडाफोडी का करताहेत? असा सवाल करत भाजपाला यावेळी विजयाची खात्री नसल्यानेच ते तोडफोड करत ईडी, सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

जानकरांना पाडणार, बंडू जाधव हॅट्ट्रिक करणार; कार्यकर्त्यांना विश्वास

भाजपाच्या जातीच्या राजकारणाला जनता भीक घालणार नाही. यासोबतच आम्हीच हिंदू धर्माचे रक्षक असल्याचे दाखवत अर्धवट राम मंदिराचे उद्घाटन आटोपले पण यासाठी कोणी संघर्ष केला हे जनतेला चांगले माहिती असल्याचेही ते म्हणाले. गद्दारांना मतदार योग्य जागा दाखवून जनता पुन्हा उद्धव ठाकरेंना साथ देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed