मुंबई : संपू्र्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. ‘अबकी पार ४०० पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघापैकी ४५ जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं महायुतीने जाहीर केलं आहे, दुसरीकडे ‘अबकी पार भाजप तडीपार’चा नारा महाविकास आघाडीने दिला आहे. त्याचदरम्यान, काल ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने आयोजित केलेल्या ‘मटा कॅफे’मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? असा सवाल आठवलेंना केला असता के म्हणाले, ”प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्याचा मला आदर आहे. आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत. आंबेडकर हे निवडणूकीच्या काळामध्ये चांगला खेळ खेळण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहेत. हे मला जमत नाही. त्यांना जे जमतं ते मला जमत नाही आणि मला जे जमतं ते त्यांना जमत नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, ”आंबेडकर वेगळे असले तरी आमच्यात एक गोष्ट चांगली आहे. जशी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकांवर एवढे आरोप करतात. आमच्यामध्ये आम्ही एवढे आरोप-प्रत्यारोप करत नाहीत. मी कधीही प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलत नाहीय. त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आहे. पण त्यांना मविआमध्ये घेतलं गेलं नाही. त्यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून सांगितलं होतं की, मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे. तरीही मविआने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे”, असंही आठवले यांनी कॅफेत सांगितलं आहे.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, ”आंबेडकर वेगळे असले तरी आमच्यात एक गोष्ट चांगली आहे. जशी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकांवर एवढे आरोप करतात. आमच्यामध्ये आम्ही एवढे आरोप-प्रत्यारोप करत नाहीत. मी कधीही प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलत नाहीय. त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आहे. पण त्यांना मविआमध्ये घेतलं गेलं नाही. त्यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून सांगितलं होतं की, मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे. तरीही मविआने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे”, असंही आठवले यांनी कॅफेत सांगितलं आहे.
”मान-अपमान सहन न करण्यापेक्षा त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही, हा त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, मी एवढा चर्चेत नसतो”, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं. ”त्यांच्यावर आरोप केला जातो की, वंचित बहुजन आघाडी ही ‘बी’ टीम आहे. त्यांनी बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला. नागपुरात ठाकरेंना पाठिंबा दिला. असा प्रश्न आठवलेंना केला असता ते म्हणाले की, ”ते त्यांचे डावपेच आहेत. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला द्यायचा नाही. कुणाला कुठे उभं करायचं. या गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट राजकारणी आहेत”, असं दिलखुलास उत्तर रामदास आठवले यांनी कॅफेत दिलं आहे.