• Sat. Sep 21st, 2024
दोघे चेंबरमध्ये उतरताच बेशुद्ध पडले, तिसरा मदतीसाठी गेला, तिघांनीही जीव गमवला

नांदेड: शहरातील मालटेकडी परिसरातील एका मलउपसा केंद्रात गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. यात दोन कामगारांसह अन्य एका युवकाचा समावेश आहे. शंकर माधव वरसवाड (३५), राजू व्‍यंकटी मेटकर (२५), गजानन ऊर्फ विकी पुयड (३०) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके अंतर्गत केंद्र शासन पुरुस्कृत अमृत २.० योजने अंतर्गत माळटेकडी एसपीएस (मलउपसा केंद्र) येथे नवीन मशिनरीज उभारणी करण्यासाठी खासगी एजन्सीचे सुपरवायझर शिवरामअप्पा गंदीगुडे आणि शंकर माधव वरसवाड, राजू व्‍यंकटी मेटकर या दोन मजुरांनी कामास सुरुवात केली.
कोल्हापूर हादरलं! एकाच दिवसात हत्येच्या तीन घटना समोर, पोलीस तपासात गुंतले
हे काम करताना शंकर आणि राजू हे मलवाहिनी चेंबर बंद करण्यासाठी चेंबरमध्ये उतरुन काम करत असताना चेंबरमधील गॅसमुळे श्वास कोंडून गुदमरल्यामुळे दोघे जण बेशुध्द पडले. त्यानंतर एक नागरिक गजानन उर्फ विक्की पुय्यड हा त्यांचा बचाव करण्यासाठी जबरदस्तीने चेंबरमध्ये उतरला असता तो पण बेशुध्द पडला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित तिघांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. कामगारांचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला किंवा विषारी गॅसमुळे झाला याचे सत्य मृतांच्या शवविच्छेदनानंतर समोर येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून ऐनवेळी उगले यांची उमेदवारी रद्द करून डख यांना मैदानात उतरवलं

मालटेकडी परिसरात महापालिकेचे मलउपसा केंद्र आहे. याठिकाणी एका एजन्सीमार्फत मशनरी बदलण्याचे काम चालू आहे. या ठिकाणच्या खड्यात मिथेन गॅस असतो. यावेळी दोन कामगार खाली उतरले होते. ते बेशुध्द होऊन पडले. ही माहिती समजताच त्यांना काढण्यासाठी बाहेरील एक व्यक्ती खाली उतरला. तिघांनाही नागरिकांनी बाहेर काढून विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केली, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त गिरीष कदम यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed