• Sat. Sep 21st, 2024
काँग्रेसमध्ये गर्दीच नसे, ए खुदा, तेरा शोरुम इतना, तो गोडाऊन कितना? उल्हास पाटलांची शेरोशायरी

निलेश पाटील, जळगाव : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आज शहरात पार पडली. नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी यावेळी भाषणातजबरदस्त शेरो शायरी केली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मंत्री गिरीश महाजन यांनी वन्स मोअर देत उल्हास पाटील यांना प्रतिसाद दिला.

डॉ. उल्हास पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच असे म्हटले की ‘कॉंग्रेसमध्ये असताना कार्यकर्त्यांची एवढी गर्दी पाहिली नव्हती. पहिल्यांदाच कार्यकर्त्यांच्या एवढ्या मोठ्या गर्दीसमोर बोलत आहे.’ पुढे त्यांनी गर्दीला उद्देशून म्हटलं की “ए खुदा तेरी भी क्या कमाल है… तेरा शोरुम इतना है… तो तेरा गोडाऊन कितना होगा” अशी हिंदीमध्ये शेरोशायरी केली.

यावर तेथील उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी दाद देत ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी वन्स मोअर म्हणत पुन्हा शायरी करण्याचा आग्रह धरला. तेव्हा पाटील यांनी पुन्हा शायरी केली.
दादांचे आभार, ज्युनिअर विखेंचं ज्युनिअर पवारांशी मनोमीलन, सुजय-अजितदादा राजकीय भेटीची चर्चा
डॉ. उल्हास पाटील यांनी अनेक वर्ष कॉंग्रेससोबत घालवली. कॉंग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख होती. परंतु काही महिन्यांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडत कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपात प्रवेश केला. पाटील यांना घेतलेल्या निर्णयामुळे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याचा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद पहायला मिळतील.
ज्या दिवशी दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील, त्याच दिवशी मीही मुख्यमंत्री, अजितदादांचं मिश्कील भाष्य
अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून रावेर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या राजकारणात सक्रिय झाल्या, तेव्हापासूनच त्या भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांशी केतकी पाटील यांनी भेटी घेतल्याचेही वृत्त आले होते. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांचेही भाजपात प्रवेश करण्यासाठी तळ्यात मळ्यात सुरु होते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

संपूर्ण देशवासियांचे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या तसेच देशाला विकासाच्या वाटेने नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे डॉ. उल्हास पाटील आणि केतकी पाटील यांनी जानेवारी महिन्यातील पक्षप्रवेश सोहळ्यावेळी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed