• Thu. Mar 12th, 2026
    पालघरमध्ये २५ एकर जागेत बनणार अत्याधुनिक मध्यवर्ती कारागृह; ६३० कोटींचा निधी मंजूर

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : राज्यातील विविध कारांगृहात, शिक्षा झालेल्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कारागृहात कैद्यांची गर्दी होत असून त्यामुळे कैद्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यात नवीन कारागृह बांधण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिलेल्या पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी नुकताच ६३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.
    पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे सावट! पाण्याचा वापर जपून करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन
    पालघर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कैदी ठाणे आणि तळोजा येथील कारागृहात ठेवण्यात आले आहेत. सुनावणीसाठी न्यायालयात त्यांची ने-आण करण्यासाठी पोलिसांना अनुक्रमे १०० ते १५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ लागत असून कैद्यांना न्यायालयात आणण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. मध्यवर्ती कारागृह उभारण्यासाठी पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपासून प्रयत्न सुरू असून त्या प्रयत्नांना आता यश आले आहे. पालघरजवळील उमरोळी येथील सरकारच्या अख्यातरित असलेली सर्वे क्रमांक ३०८ मधील सुमारे २३० एकर जागेपैकी मध्यवर्ती कारागृहासाठी २५ एकर जागा निश्चित करण्यात येऊन ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुरुंग प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यात पश्चिम रेल्वेवरील उमरोळी रेल्वेस्थानकाजवळ कारागृह उभारण्यात येईल, अशी घोषणा तीन वर्षांपूर्वी सरकारने केली होती. त्यासाठी २५ एकर जमीन उमरोळी येथे मंजूरही केली. परंतु त्यासाठी निधी उपलब्ध न करून दिल्याने या कारागृहाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे कैद्यांना अन्य कारागृहांत दाटीवाटीने राहावे लागत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *