• Mon. Mar 16th, 2026
    शिवतीर्थावर इंडियाची एकी दिसणार, गांधींच्या मंचावर पवार ठाकरेंसह तेजस्वी यादव असणार!

    मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. या यात्रेची समारोपाची सभा रविवारी मुंबईतील शिवतीर्थावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या भव्य सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी उद्या राहुल गांधी यांची मुंबईत ‘न्याय संकल्प’ पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही ‘न्याय संकल्प’ पदयात्रा असणार आहे.या सभेला राष्ट्रीय नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
    कैसे है आप दाजीसाहब? गळाभेट घेऊन राहुल गांधीकडून विचारपूस, धुळ्यातून सोनियांनाही फोन

    सभेपूर्वी उद्या राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ही पदयात्रा असणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुंबईच्या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पदयात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत.
    कॉंग्रेसचे ‘शेतकरी जोडो’, राहुल गांधी घालणार बळीराजाच्या प्रश्नांना हात, चांदवडला गुरुवारी संवाद सभा

    भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेचे पोस्टर लॉन्च

    राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची रविवारी १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून या सभेच्या पोस्टरचे लॉन्चिंग आज येथे करण्यात आले.

    राहुल गांधी चैत्यभूमीवर दाखल तर धारावीचीही भलतीच भुरळ; उद्या होणार न्याय यात्रेची सांगता

    मुंबईत १७ मार्चला शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर लॉन्च करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये “शिवतीर्थावर होणार न्याय गर्जना, न्यायासाठी लढायचं गद्दारांना नडायचं, संविधानाला टिकवायचं, आठवणीने यायचं अशा आशयाचा मजकूर आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed