• Thu. Mar 19th, 2026
    आधी शरद पवारांचा इशारा, आता रोहित पवारांनी सुनावलं, सुनील शेळकेंवर टीकेची झोड

    पुणे: सुनील शेळके ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ती एक स्वाभिमानी भूमी मानले जाते. त्या भूमीमध्ये लोकप्रतिनिधित्व करत असताना तुमच्यात इतका अहंकार येतो की तुम्ही देशाच्या एका मोठ्या आणि अनुभवी नेत्यावर खालच्या भाषेत बोलता, लोकं हे सहन करणार नाही, असं म्हणत रोहित पवारांनी शेळकेंना फैलावर घेतलं आहे. राज्याचं राजकारण सद्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका नेत्यावर प्रचंड तापलेले आहे. स्वत: संयमी आणि शांत राहणारे शरद पवार यांनी आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा दिल्यानंतर आता रोहित पवारांनी पण बोचरी टीका केली आहे.
    महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, चार जागा लढविणार, ‘या’ दिवशी उमेदवारांची घोषणा
    उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आमदार सुनील शेळके यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित न राहण्यासाठी काही नेत्यांना धमकावल्याचा आरोप होता. दरम्यान याबाबत शरद पवार यांनी थेट दम देत सुनील शेळकेंना इशारा दिला आहे. शरद पवार म्हणाले, सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला आहेस हे विसरू नको! तुला ज्यामुळे चिन्ह मिळालं त्या अर्जावर खाली माझी सही आहे. मला शरद पवार म्हणतात माझ्या वाटेला कोणी गेले तर मी त्याला सोडत नाही, असा थेट दम शरद पवार यांनी सुनील शेळकेंना भरला आहे. त्यानंतर सुनील शेळके यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र घडलेल्या या राजकीय घडामोडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शेळकेंवर तुटून पडले आहेत.आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवार हे फक्त सुनील शेळकेबाबत बोले असं नाही. तर त्या वृत्तीबाबत बोलले आहे. पुणे बारामती, मावळ, आंबेगाव अशा या भागात जे लोक साहेबांच्या बाजूने आहेत. पुरोगामी विचारांच्या बाजूने आहेत. त्यांना दमदाटी करून धमकावलं जातं. त्यांना नोकरीवरून काढलं जातं. ही जी वृत्ती आहे ती योग्य नाही. म्हणून शरद पवार यांनी त्या वृत्ती आणि अहंकारी नेत्यांना धमकी दिली असं बोलायला हरकत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
    https://timesxpmarathi.indiatimes.com/maharashtratimes/maharashtra/dharashiv/uddhav-thackeray-on-amit-shah/videoshow/108305746.cms
    ही अहंकारी वृत्ती सुनील शेळकेंकडे कुठून आली असं तुम्हाला वाटत? रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात गुंडांना प्रवेश देऊन त्यांच्यासोबत फोटो काढत ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. या गोष्टींवरून लोकांमध्ये एक संदेश जातो की सरकारचा गुंडांना वरदहस्त आहे. हे पाहून काही नेत्यांना अहंकार येत असावा. राहिला प्रश्न सुनील शेळकेंचा तर ते ज्या भूमीतून लोकप्रतिनिधित्व करतात एक स्वाभिमानी भूमी मानली जाते. त्या भूमीमध्ये लोकप्रतिनिधित्व करत असताना तुमच्यात इतका अहंकार येतो की तुम्ही देशाच्या एका मोठ्या आणि अनुभवी नेत्यावर खालच्या भाषेत बोलता, लोक हे सहन करणार नाही. आपल्या आता कोण विरोधात नाही म्हणून आपला कोणीच आता विरोधक नाही अशी भावना जेव्हा लोकप्रतिनिधीमध्ये येते तेव्हा त्याचा अहंकार वाढतो. तोच अहंकार आज त्यांच्या बोलण्यामधून दिसून आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed