• Sat. Sep 21st, 2024
एक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड, तसेच मावळ या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता रत्नागिरी सिंधुदुर्गातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, कमळ फुलणार हे निश्चित आहे, असा प्रबळ दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. ते रत्नागिरी दौऱ्यावर असताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार बाळ माने, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवरून महायुती मधील शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

यही समय है…सही समय है…अबकी बार चारसो पार…फिर एक बार मोदी सरकार.. हा नारा देत असतानाच आपल्याला भाजपच्या ३७० जागा निवडून आणायच्या आहेत, यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भाजपाची असून येथे कमळ फुलवायचे आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. कोणीही कोणतेही तिकीट मागूद्यात हे तिकीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळाचंच, असा मोठा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना केला आहे.

ज्यावेळेला एक मुख्यमंत्री तुमच्याकडे येतो त्यावेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे की देअर इज नो कॉम्प्रोमाइज, कारण मी येताना देवेंद्रजींकडे बोलून आलो आहे, कारण कोकणावरती आणखी अन्याय होणार नाही, खूप झाले आता, आम्ही खूप बघितलं, आजवर कोणामुळे अन्याय झाला, हे तुम्हाला माहीत आहे, पण आता आपल्याला भारतीय जनता पार्टीवरती पण आणि आपल्या कोकणातल्या जनतेवरती पण अन्याय होऊ द्यायचा नाही, आता मोदीजी आहेत, असा आक्रमक पवित्रा डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आहे.
सुनेत्रा पवार चुलत सासऱ्यांच्या कट्टर विरोधकाच्या भेटीला, सुळेंना पाडण्यासाठी काँग्रेसच्या ६ टर्म आमदाराची मदत?
या वेळेला निश्चितच विश्वास ठेवा की हा मतदारसंघ आपण कमळाच्या चिन्हावरच लढणार आणि आपला कार्यकर्ता यावेळी कमळावर निवडून लोकसभेत जाणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्त्वांवरती भारतीय जनता पार्टीचे सरकार काम करत असून अंत्योदय हे मूळ तत्त्व आहे. ज्याच्यापर्यंत कोणीही पोहोचत नाही त्याच्यापर्यंत मोदीजींच्या सरकारच्या योजना भाजपाचा कार्यकर्ता पोहोचवत आहेत. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं काम मोदी सरकारने केलं आहे. आता साठ दिवसात मोठं काम करावे लागणार आहे. विकसित भारतासाठी मोदींसाठी लोक मतं द्यायला तयार आहेत, असे सांगत त्यांनी यावेळी विरोधकांचाही समाचार घेतला.
हीना गावित यांचे काकाही लोकसभेला इच्छुक, शिंदे गटाचाही विरोध, नंदुरबारमध्ये विद्यमान खासदारांना डच्चू?
इथे असतील अजून, कोणीही असतील, उबाठा असेल सुबाठा असेल, अजून असे कोण कोण असतील पण एक लक्षात घ्या या वेळेचा मतदान हे विकसित भारतासाठी आहे. मोदी सरकारने आजवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक योजना आणल्या, स्टार्ट अप इंडिया, पीएम विश्वकर्मा, घरकुल योजना, हर घर हर नल पाणी योजना, मुद्रा योजना अशा अनेक योजना मोदी सरकारने आणल्या. शेतकरी, मच्छीमार, युवक, महिला अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकारने योजना आणल्याचं सावंत म्हणाले.
Read Latest National News Updates And Marathi News

२००४ ते २०१४ या काँग्रेसच्या काळात देशासाठी एकही योजना आली नाही. मनमोहन सिंग सरकारने केलेली एक तरी योजना सांगा, हे माझं खुले आव्हान आहे, हेच काँग्रेसचे नेते होते आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे भारत देश डबघाईस गेला, काँग्रेसच्या काळात अनेक स्कॅम उघडकीस आले, हे नवमतदाराला सांगा असंही आवाहन त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed