• Sat. Mar 14th, 2026

    आम्ही ‘ती’ जागा सोडणार नाही, लोकसभेच्या जागेवरुन रामदास कदमांनी भाजपला स्पष्टच सांगितले

    आम्ही ‘ती’ जागा सोडणार नाही, लोकसभेच्या जागेवरुन रामदास कदमांनी भाजपला स्पष्टच सांगितले

    रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच रत्नागिरीमध्ये पण आम्हीच असं होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचं आहे का? अशा शब्दात रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
    Video: शिंदे गटाच्या आमदारांना झालंय काय? संजय गायकवाड यांनी युवकाला लाठीने फोडले, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
    यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे रायगड लोकसभेचे उमेदवार माजी खासदार अनंत गिते यांच्यावर टीका करत त्यांना केवळ निवडणुका आल्या की कुणबी समाज म्हणत भावनात्मक ब्लॅकमेल करतात, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. रत्नागिरीची जागा ही शिवसेनेची आहे. भाजपच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, याचं असं होईल आपण दोघे भाऊ भाऊ तुझा आहे. ते वाटून खाऊ आणि माझ्या याला हात नको लावू. पण असं होतं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रत्नागिरीची देखील जागा सोडणार नाही. आम्ही ती लढवणार. आमचे आहे. आमच्या हक्काचे आहे, आता जे खासदार विनायक राऊत आहेत मागच्या वेळेला त्यांच्या प्रचारसाठी सावंतवाडी शेवटची प्रचारसभा मी घेतली होती. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आमची हक्काची आहे. ती आम्ही का सोडू? असा खडा संवादच रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.या सगळ्या विषयावरून महायुतीमध्ये फूट पडेल का असं विचारता रामदास कदम म्हणाले की, अजिबात फूट पडणार नाही. प्रत्येकाला वाटत असतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. अजून जमलं तर जमलं आणि असा प्रयत्न करायला कुठे अडचण नसते. तसंच तो प्रयत्न असावा, असं मला वाटतं. पण माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच असं कधी होत नसतं, अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावलं आहे.

    मुख्यमंत्री आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांना बोलवून समज देतील | संजय शिरसाट

    ज्या श्रीवर्धन मतदारसंघात ७०% कुणबी समाज आहे. त्यावेळेला रायगड लोकसभा मतदारसंघात मागच्या वेळेला सुनील तटकरे यांना लीड मिळाला होता. याच आत्मपरीक्षण गिते यांनी कधी केला आहे का? कुणबी समाजासाठी या माणसाने काहीही केलेले नाही. गिते सहा वेळेला खासदार झाले. दोन चार वेळेला मंत्री झाले. पण कोणताही विकास केला नाही, असं रामदास कदम म्हणाले आहेत. या वेळेला रायगड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळेल. ३८ निवडून येतील. यामध्ये कोणतीही शंका नाही तटकरे चांगलं काम करत आहेत, अशा शब्दात त्यांनी खासदार सुनील तटकरे यांचं कौतुकही केलं. विद्यमान खासदार असलेल्या ठिकाणी उमेदवारी शक्यतो बदलत नाहीत, असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed