पुणे : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आता राजकीय भाषा बोलत असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच त्यांचे बोलविते धनी आहेत. किंबहुना ठाकरे-पवारांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सत्ताधारी आमदारांनी प्रत्यक्ष सभागृहात हे आरोप करून यासंबंधी त्यांच्या एसआयटी चौकशीची घोषणाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. शरद पवार यांचेच जरागेंना पाठबळ असल्याचे सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यातून वारंवार सूचित झाले.बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनी राष्ट्रवादीतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जनतेचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. यानंतर पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. दरम्यान, नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आशिष देशमुख यांनी शरद पवार हे जरांगेंना बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याचा दावा केला. याच दाव्यावर पवार यांना विचारलं असता, त्यांनी देशमुख यांची खिल्ली उडवली.
माझे आणि मनोज जरांगे यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, एक फोन जरी केला असेल…. शरद पवार आक्रमकबीडमधून मनोज जरांगेंना उमेदवारी देणार?
मनोज जरांगेंना आपण बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार आहात? असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवार यांनी ‘एवढी आमच्यावर वेळ आलीये का…?’ असं मिश्किल उत्तर दिलं. त्याचवेळी हा दावा कुणी केलाय, असा पत्रकारांना प्रश्न केला. पत्रकारांनी आशिष देशमुख यांचं नाव घेतल्यावर त्यांनी ‘मर्यादित मेंदूचा माणूस’ म्हणून त्यांची खिल्ली उडवली. ज्यांचा मेंदू मर्यादित आहे, त्यांच्याबद्दल अधिक काय बोलणार… असे म्हणून त्यांना फटकारले.
मनोज जरांगे ६ महिन्यांपूर्वी कोणाला माहिती नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय : प्रकाश आंबेडकर
जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात…
त्याचवेळी मनोज जरांगे यांच्याशी आपला संबंध जोडू पाहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही खडे बोल सुनावले. जबाबदारीच्या पदावर बसलेली लोकं इतकं पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
माझा आणि जरांगेंचा काडीमात्र संबंध नाही, मी चौकशीसाठी तयार; भाजप नेत्यांच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर
माझे आणि मनोज जरांगे पाटील यांचे फोन कॉल तपासा….
जरांगे यांचं उपोषण सुरू झाल्यावर त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना त्याक्षणी दिला. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्याशी माझं एका शब्दानेही बोलणं झालेलं नाही. माझे आणि मनोज जरांगे पाटील यांचे फोन कॉल तपासा, एक फोन जरी आम्हा दोघांमध्ये झाला असेल वा भेट झाली असेल तर वाटेल ते मान्य करेन, अशा शब्दात आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.