• Mon. Jun 8th, 2026
    ‘पोरकट’ म्हणत शिंदे फडणवीसांना सुनावलं, जरांगेंशी नाव जोडल्याने शरद पवार संतापले

    पुणे : मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, त्यावेळी त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना त्याक्षणी दिला. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्याशी माझं एका शब्दानेही बोलणं झालेलं नाही. माझे आणि जरांगे यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, एक फोन जरी केला असेल तर वाटेल ते मान्य करेन, अशा आक्रमक अंदाजात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली स्क्रिप्ट मनोज जरांगे बोलत आहेत, असा गंभीर आरोप भाजप आमदारांनी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला. तसेच यासंदर्भात एसआयटी चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली. याचविषयी पुण्यात पत्रकारांनी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडक शब्दात सुनावले.
    जरांगे सागर बंगल्यावर येणार, मग आम्ही गप्प बसणार काय? आम्ही पण मराठे, नितेश राणे यांनी ललकारलं

    यशवंतराव चव्हाणांपासून मी महाराष्ट्र पाहतोय. पण आतापर्यंत जबाबदार लोक पोरकटपणे बोलत नव्हते. आज जबाबदार लोक पोरकटपणे बोलतायेत, हे मी पाहिले. त्यांचं उपोषण सुरू झाल्यावर मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. दोन समाजात अंतर राहिलं असं करू नका, त्याचवेळी मी त्यांना सांगितलं. माझे आणि जरांगे यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, एक फोन जरी केला असेल तरी वाटेल ते मान्य करेल, असं आव्हानच त्यांनी विरोधकांना दिलं.
    जरांगेंच्या वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ,शेलांरांच्या मागणीवर एसआयटीची घोषणा, थोरात वडेट्टीवारांनीही सगळं काढलं

    जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आणि त्यादरम्यानच्या राड्याची एसआयटी चौकशी करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही शरद पवार यांनी तिरकस शेरा मारला. त्यांच्या आंदोलनाची बिनधास्त एसआयटी चौकशी लावा. हवं तर निवृत्त न्यायमुर्तीच्या अध्यक्षतेखालील चौकशी करा. पण आमचे कॉल रेकॉर्ड तपासत असताना त्यांचेही (सत्ताधाऱ्यांचे) फोन तपासा, असं पवार म्हणाले.

    राजेश टोपे यांच्यावरील आरोपांना देखील शरद पवार यांनी उत्तर दिलं. टोपेंवरील आरोपांचं खंडन करताना त्यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना शेलक्या शब्दात सुनावलं. राजेश टोपे हे जरांगे यांचे शेजारी असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्य शासनाने राजेश टोपे यांची मदत घेतली. एका बाजूला मदत घेऊन दुसऱ्या बाजूला आरोप करायचे, हे कुठलं राजकारण? असा सवाल त्यांनी विचारला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed