• Thu. Mar 12th, 2026
    महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं लावलंय, जितेंद्र आव्हाड नार्वेकरांवर भडकले

    मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांना खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अपात्र ठरवण्याच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहे. अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान आता या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता जितेंद्रे आव्हाडांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
    NCP Mla Disqualification Case : राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचाच, राहुल नार्वेकर यांचा निर्णय
    जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले की ते दहाव्या अनुसूचीकडे कॅलिडोस्कोपद्वारे पाहत आहेत- “युती आघाडी होतात किंवा तुटतात हे राजकारण आहे. सर्वच कृत्ये किंवा आचरण हे पक्षांतर मानले जाऊ शकत नाही”. कायद्याच्या वरचे एक नवे राजकीय तत्वज्ञान महाराष्ट्रात जन्माला आले आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

    दरम्यान त्यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे शिकायचे असल्यास राहुल नार्वेकर याची उत्तम शिकवणी घेऊ शकतात, अशा शब्दांत आव्हाडांनी टीकास्त्र डागले आहे. ते पुढे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचा निकाल हास्यास्पद आहे. तसेच नार्वेकरांनी १०वी सूची काढून टाकावी. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कसं वाटोळं लावतात त्यांचं उत्तम उदाहरण आजच वाचन होतं. राहुल नार्वेकर धुतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे ते म्हणाले आहेत.

    Asha Worker Protest : कुपोषित बालकांची सेवा करतो तरी सरकारला कदर नाही; आशा सेविकेनं धक्कादायक अनुभव सांगितला

    आव्हाड पुढे म्हणाले की. स्वत:ला सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला धुतराष्ट्रांनी उघड पाठिंबा दिला. त्यांना सगळ्यातून बाहेर काढलं. आम्हालाही काढलं, मात्र आम्हाला याचा आनंद नाही. पण महाराष्ट्रात जे गैर होत आहे, याचं आम्हाला दु:ख आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed