• Sat. Sep 21st, 2024

नांदेडला पावसाने झोडपले; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, बळीराजा संकटात

नांदेडला पावसाने झोडपले; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, बळीराजा संकटात

नांदेड: जिल्ह्यातील काही भागांत रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीतील गहू आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ठिकठिकाणी आंब्याचा मोहोर गळाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकरी सहन करीत आहेत. चार महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
जेव्हा अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता!
रविवारी रात्री झालेल्या गारपिटीने काही तालुक्यांना चांगलाच तडाखा बसला. जिल्ह्यातल्या हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुदखेड व किनवट तालुक्यात रविवारी अचानक पावसाला प्रारंभ झाला. गारांसह झालेल्या या पावसामुळे रब्बींच्या पिकांना मोठ्या तडाखा बसला. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवल्याची भावना व्यक्त करण्यात आली. हरभरा, गहू, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हिमायतनगर तालुक्यातल्या कारला, सिबदरा, सौना, मंगरूळ, धानोरा, वरंगटाकळी, एकंब्बा, डोलारी, जवळगाव, टेंभुर्णी या भागांत गारांसह पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विजांच्या कडकडाटांसह गारपीट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भोकर तालुक्यातल्या अनेक गावांत गारपीट झाल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. गारपिटीमुळे काढणीला आलेली पिके अक्षरश: आडवी झाली. गहू, ज्वारी, कांदा, हरभरा, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हवामान खात्याने नऊ, १० आणि ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.

पुढील दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार, अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा : अशोक चव्हाण

वादळवाऱ्यांसह आंबा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांतील आंब्यांच्या झाडांचे मोहोर झडून गेला आहे. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यांमुळे अपेक्षेइतके उत्पादन होत नाही. सध्या जिल्ह्यातील हवामान रब्बीतील पिकांसाठी फारसे पोषक नाही. रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने तत्काळ मदत करणे आवश्यक आहे. पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed