संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे आहे की, आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ओबीसी आणि मागासवर्गीय मुलींची १००% फी माफ करायची, त्यासाठी एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जातीच्या, पंथाच्या, धर्माच्या मुलीला मेडीकल इंजिनिअरींगच नाही तर डीम युनिव्हर्सिटीसहित फी सरकार भरणार आहे. त्यामुळे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढेल, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दर्शवला.
जळगावातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा त्यांच्यावर झालेल्या गोळीबारात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अपुऱ्या माहितीवर बोलणं काही बरोबर नाही. हल्ला झालाय हे मला कळलं, यावर मी काहीच सांगू शकत नाही. दरम्यान, राज्यातल्या घडणाऱ्या घटनांबद्दल सवाल केला असता ते म्हणाले की, राज्यातल्या घडणाऱ्या घटना या चिंताजनकच आहेत. त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी देखील होत तसेच कारवाई देखील होत आणि सरकार याबाबतीत खूप सतर्क आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.